मुंबई : घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावला, असं म्हणत शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे. मुंबईतील टोके नाक्यावरील वसुली केली जात असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंनी आणखी एक घोटाळा बाहेर काढला, खोके सरकार म्हणत टिकाही केली
अहो, मर्सिडीज बॉय. अडीच वर्ष जेव्हा तुमची सत्ता होती, तुम्ही मंत्री आणि तुमचे डॅडी मुख्यमंत्री होते. तेव्हा नाही का सुचली तुम्हाला टोल रद्द करण्याची उक्ती? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. टोलवाटोलवीचे राजकारण करणारे तुम्ही, टोलच्या विषयावर बोलण्याची गरज आताच का वाटली ? याचंही स्पष्टीकरण जनतेला द्या. असंही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार,” उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार ? चर्चांना उधाण
दरम्यान, दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एक पत्र देखील पाठवलं आहे. घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावलाय! आता तर मुंबई महानगरपालिकेवर पूर्व आणि पश्चिम महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी टाकल्यावरही टोल मात्र MSRDC मार्फत घेतला जातोय, शिवाय मुंबईचा स्ट्रीट टॅक्स आहेच. हा दुहेरी टॅक्स मुंबईकरांनी का भरावा? त्यातच मुंबईच्या महामार्गांवरच्या होर्डिंग्सचा महसुल मात्र मुंबई महानगरपालिकेला मिळत नाहीये. आज ह्याच विषयावर पत्रकार परिषद घेतली आणि मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून काय काय मागण्या केल्या ह्याची माहिती दिली. आम्ही सत्तेत आल्यावर मुंबईकरांची ह्या अन्यायकारक टोलपासून सुटका करणारच! पण आत्ताच्या सरकारकडून मुंबईकरांना लुटण्याचा जो खेळ चाललाय त्याचा पर्दाफाश केला. असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
अहो,मर्सिडीज़ बॉय… @AUThackeray अडीच वर्षं जेव्हा तुमची सत्ता होती, तुम्ही मंत्री आणि तुमचे डॅडी मुख्यमंत्री होते… तेव्हा नाही का सुचली तुम्हाला टोल रद्द करण्याची उक्ती…?
टोलवाटोलवीचे राजकारण करणारे तुम्ही… टोलच्या विषयावर बोलण्याची गरज आताच का वाटली? याचंही स्पष्टीकरण द्या…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे अन् राष्ट्रवादीला एकत्रित धक्का, अनेक कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“राष्ट्रवादीने भाजपशी कितीही सलगी वाढवली तरी भ्रष्टाचारच्या आरोपातून मुक्त होता येणार नाही”
हेही वाचा…“पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला”, मनसेंनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात कसं आलं ? “
हेही वाचा…अंबादास दानवेंसोबतच्या राड्यानंतर भूमरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आवाज वाढला कारण..”