मुंबई : घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावलाय. असं म्हणत शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुर्व आणि पश्चिम महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी टाकल्यावरही टोल मात्र एमएसआरडीसी मार्फत घेतला जात असल्याचा आरोप ठाकरेंनी लावला आहे. त्यावर आता मनसेच्या नेत्या गजानन काळे यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…अंबादास दानवे, सत्तार अन् भुमरे यांच्यात जोरदार राडा, बैठकीत मोठा गोंधळ
शिल्लक सेनेचे युवराज यांचे वराती मागून घोडे, भाजपबरोबर ५ वर्षे सराकारमध्ये असताना आणि नंतर घरात फेसबुक मुख्यमंत्री असताना टोल नाक्यांबद्दल चकार शब्द न काढणारे आज टोल नाके बंद करा म्हणत आहेत आणि हो फक्त तोंडाचे बुडबुडे बाहेर काढणार, टोल नाके बंद करा म्हणून आंदोलन करणार नाही हे ही सांगायला ते विसरले नाहीत … असो पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला आहे, हे ही नसे थोडके, असंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“देशपातळीवर नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय मला दिसत नाही”, अजित पवार
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एक पत्र देखील पाठवलं आहे. घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावलाय! आता तर मुंबई महानगरपालिकेवर पूर्व आणि पश्चिम महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी टाकल्यावरही टोल मात्र MSRDC मार्फत घेतला जातोय, शिवाय मुंबईचा स्ट्रीट टॅक्स आहेच. हा दुहेरी टॅक्स मुंबईकरांनी का भरावा? त्यातच मुंबईच्या महामार्गांवरच्या होर्डिंग्सचा महसुल मात्र मुंबई महानगरपालिकेला मिळत नाहीये. आज ह्याच विषयावर पत्रकार परिषद घेतली आणि मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून काय काय मागण्या केल्या ह्याची माहिती दिली. आम्ही सत्तेत आल्यावर मुंबईकरांची ह्या अन्यायकारक टोलपासून सुटका करणारच! पण आत्ताच्या सरकारकडून मुंबईकरांना लुटण्याचा जो खेळ चाललाय त्याचा पर्दाफाश केला. असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
शिल्लक सेनेचे युवराज यांचे वराती मागून घोडे …
भाजपा बरोबर 5 वर्षे सरकारमध्ये असताना आणि नंतर घरात फेसबुक मुख्यमंत्री असताना टोल नाक्यांबद्दल चकार शब्द न काढणारे आज टोल नाके बंद करा म्हणत आहेत आणि हो फक्त तोंडाचे बुडबुडे बाहेर काढणार,टोल नाके बंद करा म्हणून आंदोलन करणार नाही…
— Gajanan Kale (@MeGajananKale) August 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात कसं आलं ? “
हेही वाचा…अंबादास दानवेंसोबतच्या राड्यानंतर भूमरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आवाज वाढला कारण..”
हेही वाचा…आदित्य ठाकरेंनी आणखी एक घोटाळा बाहेर काढला, खोके सरकार म्हणत टिकाही केली
हेही वाचा…“वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार,” उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार ? चर्चांना उधाण