औरंगाबाद : जिल्हा नियोजन बैठकीत विकास निधीवरून ठाकरे आणि शिंदे गटातील मंत्र्यांसोबत मोठा राडा झाल्याचं दिसून आलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री संदिपान भूमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याच जोरदार खडाजंगी बघायला मिळाली आहे. यावर आता पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…राहुल गांधी संसदेत पुन्हा परतले, मोदी-शहांना राहुल गांधींची भिती
जिल्ह्या नियोजन बैठकीत कन्नड मतदारसंघातील आमदार उदयसिंह राजपुत यांनी संदीपान भूमरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. विकास निधी देण्यात भेदभाव करत असल्याचं म्हणत त्यांनी मंत्र्यांवर थेट कागदपत्रचं फेकून दिलीत. त्यानंतर अंबादास दानवे या प्रकरणावरून आक्रमक झाले अन् संदीपान भूमरे आणि अब्दुल सत्तार यांनी देखील भांडण्यात उडी घेतली. त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला.
हेही वाचा…“तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा”
दरम्यान, यावर आता संदीपान भूमरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाच्या निधीबाबत बोलण्यापेक्षा तालुक्यांना निधी दिला हे महत्वाचं आहे. ठाकरे गटाला म्हणण्यापेक्षा कन्नड तालुक्याला किती निधी दिला? इथं ठाकरे गट वगैरे असं काही नाही. इथं तालुका धरला जातो. तालुक्याला किती निधी दिला ते पाहा. जितका निधी वैजापूर, सिल्लोड आणि गंगापूर तालुक्याला दिला तितकाच निधी कन्नड तालुक्याला दिला आहे. सगळ्या तालुक्यांना सारखा निधी देण्यात आला आहे. इतर तालुक्यांना दिला तितकाच निधी कन्नड तालुक्याला दिला आहे. इथे उदयसिंह राजपूत, ठाकरे गट असा काही विषय नाही. असं भूमरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…आदित्य ठाकरेंनी आणखी एक घोटाळा बाहेर काढला, खोके सरकार म्हणत टिकाही केली
हेही वाचा…“वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार,” उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार ? चर्चांना उधाण
हेही वाचा…“आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू”
हेही वाचा…अंबादास दानवे, सत्तार अन् भुमरे यांच्यात जोरदार राडा, बैठकीत मोठा गोंधळ
हेही वाचा…“देशपातळीवर नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय मला दिसत नाही”, अजित पवार