नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यापासून मणिपुर मध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहेत. यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. अविश्वास प्रस्तावावर संसदेत सध्या चर्चा सुरू असून विरोधकांकडून नरेंद्र मोदी सरकारला तीन प्रश्न केले आहेत. यामुळे संसदेत मोठा गोंधळ बघायला मिळाला.
हेही वाचा…“राष्ट्रवादीने भाजपशी कितीही सलगी वाढवली तरी भ्रष्टाचारच्या आरोपातून मुक्त होता येणार नाही”
काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावर बोलण्याआधी काॅंग्रेसचे खासदार गौरव गोगाई उठले. त्यावरून भाजपच्या मंत्र्यांनी काॅंग्रेससहीत राहुल गांधींना डिवचले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडांजगी बघायला मिळाला. आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपुरमध्ये का गेले नाहीत? मनिपुरच्या मुद्याबाबत मोदींना बोलण्यासाठी ८० दिवस का लागले? तसेच मोदींनी मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत निलंबित का केले नाही ? असे प्रश्न विरोधकांकडून भाजपला काॅंग्रेसचे खासदार गौरव गोगाईंनी विचारले.
हेही वाचा…“पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला”, मनसेंनी ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, पुर्ण इंडिया अलान्सचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा आहे. आमचा नाईलाज आहे की आम्हाला हा अविश्वास प्रस्ताव संसदेत आणावा लागला. इथे मुद्दा संख्येचा नव्हता हा मणिपुरसाठीच्या न्यायासाठीचा मुद्दा होता. इंडिया आघाडीनं मणिपुरसाठी हा प्रस्ताव आणला आहे. मणिपुरचा तरूण वर्ग, मुली, शेतकरी, विद्यार्थी न्याय मागत आहेत. असंही गोगाई म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“अमित शाहांवर हक्कभंग प्रस्ताव आणला पाहिजे,” संजय राऊतांची मोठी मागणी
हेही वाचा…रविंद्र तुपकरांना भाजपकडून ऑफर, पक्ष संघटना फोडण्याचं भाजपचं काम, राजु शेट्टींचा गंभीर आरोप
हेही वाचा…“तेव्हा जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप डोळे लावून ध्यान करत होता का ?”
हेही वाचा…“अहो, मर्सिडीज बॉय, तेव्हा नाही का सुचली टोल रद्द करण्याची उक्ती?” चित्रा वाघ यांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…ठाकरे अन् राष्ट्रवादीला एकत्रित धक्का, अनेक कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात प्रवेश