नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा संसदीय पावसाळी अधिवेशनात काल शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर त्यावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पलटवार केला. त्यामुळे राज्यसभेत दोन्ही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शाब्दिक चकमक देखील झाली.
हेही वाचा…“पक्ष संपल्यावर का होईना मुंबईकर आणि राज्यातील जनतेबद्दल पाझर फुटू लागला”, मनसेंनी ठाकरेंना डिवचलं
राज्यसभेत बोलतांना संजय राऊतांनी मोदींवर टिका केली. त्यावर अमित शहा यांनी संजय राऊतांना सुनावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशात सन्मान केला जातो. पण तो सन्मान त्यांचा वैयक्तिक नसून महान लोकशाही पंरपरा असलेल्या देशातील नेत्याचा तो गौरव असतो. असं राऊतांनी म्हटलं आहे. तसेच अमित शाहा यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला पाहिजे. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात कसं आलं ? “
दरम्यान, अमित शाहांनी माझ्या तोंडी खोटी वाक्य टाकली आहेत. खरंतर, त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे. मोदींचा परदेशात सन्मान केला जातोय. ही गळाभेट नरेंद्र मोदी यांची नसून महान लोकशाही परंपरा असलेल्या देशाच्या नेत्याचा सन्मान असतो, असं मी बोललो. पण अमित शाहांनी नंतर वेगळंच जोडलं. माझ्या तोंडी असं वाक्य असेल तर मी खासदारकी सोडायला तयार आहे. ते आमच्या तोंडी काहीही घालतात आणि स्वत:ची टिमकी वाजवतात. महान लोकशाहीवादी देश म्हणून भारताची परंपरा आणि महान लोकशाही असल्याने नरेंद्र मोदींचा गौरव होतो आणि आपण त्या लोकशाही परंपरेला काळिमा फासला आहे. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रविंद्र तुपकरांना भाजपकडून ऑफर, पक्ष संघटना फोडण्याचं भाजपचं काम, राजु शेट्टींचा गंभीर आरोप
हेही वाचा…“तेव्हा जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप डोळे लावून ध्यान करत होता का ?”
हेही वाचा…“अहो, मर्सिडीज बॉय, तेव्हा नाही का सुचली टोल रद्द करण्याची उक्ती?” चित्रा वाघ यांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…ठाकरे अन् राष्ट्रवादीला एकत्रित धक्का, अनेक कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“राष्ट्रवादीने भाजपशी कितीही सलगी वाढवली तरी भ्रष्टाचारच्या आरोपातून मुक्त होता येणार नाही”