मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसने कंबर कसली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राज्यात भाजपनंतर काॅंग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. यातच त्यांच्याकडे आता विरोधी पक्षनेते पद देखील आलं आहे. यातच आता राज्यात १६ ऑगस्टनंतर काॅंग्रेसने पदयात्रा काढणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासाठी काॅंग्रेसच्या जवळपास सगळ्याच बड्या नेत्यांकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…“अहो, मर्सिडीज बॉय, तेव्हा नाही का सुचली टोल रद्द करण्याची उक्ती?” चित्रा वाघ यांनी ठाकरेंना डिवचलं
राज्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फुट पडली आहे. त्याचा सर्व आरोप विरोधकांनी भाजपवर लावल्याने जनमत या तिन्ही पक्षांच्या विरोधात गेल्याचं दिसून येत आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी आता काॅंग्रेसने राज्यात रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. यासाठी पहिली पदयात्रा आता १६ ऑगस्ट रोजी सुरू होत असून त्यासाठी काॅंग्रेसच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा…ठाकरे अन् राष्ट्रवादीला एकत्रित धक्का, अनेक कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात प्रवेश
नाना पटोले यांच्याकडे पुर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांच्याकडे पश्चिम विदर्भ, मराठवाडा अशोक चव्हाणांकडे, उत्तर महाराष्ट्र बाळासाहेब थोरात तर पश्चिम महाराष्ट्र अशोक चव्हाण आणि मुंबई वर्षा गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. यातच महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात येणार असून त्यासाठी काॅंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांकडे प्रत्येकी दोन जिल्हे देण्यात आले आहेत.
काँग्रेस ४८ लोकसभा मतदार संघाचा घेणार आढावा प्रत्येक नेत्याला दोन मतदारसंघाची देण्यात आली
वसंत पुरके नंदुरबार, धुळे
सुनील देशमुख जळगाव, रावेर
यशोमती ठाकूर बुलढाणा,अकोला
रणजित कांबळे अमरावती
सुनील केदार वर्धा, यवतमाळ वाशिम
सतेज पाटील रत्नागिरी – सिंधुदुर्ग, रायगड
विजय वडे्टीवार रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया
नितीन राऊत गडचिरोली, चंद्रपूर
अशोक चव्हाण हिंगोली, परभणी
बसवराज पाटील नांदेड
नसीम खान जालना, औरंगाबाद
बाळासाहेब थोरात नाशिक ,पालघर
विश्वजीत कदम भिवंडी, कल्याण
अस्लम शेख ठाणे
प्रणिती शिंदे मावळ
कुणाल पाटील बारामती,
शिरूर चंद्रकांत हांडोरे अहमदनगर, शिर्डी
अमित देशमुख बीड, धाराशिव
विलास मुत्तेवार लातूर
बसवराज पाटील सोलापूर
हुसैन दलवाई सांगली, माढा
भाई जगताप, सातारा
पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर, हातकणगले
READ ALSO :
हेही वाचा…मोदींनी जगभरात दौरे केले मग मणिपुरचा दौरा का नाही केला ?
हेही वाचा…विरोधकांनी नरेंद्र मोदींना घेरले, मणिपुरच्या मुद्यावरून अविश्वास प्रस्तावादरम्यान विचारले तीन प्रश्न
हेही वाचा…“अमित शाहांवर हक्कभंग प्रस्ताव आणला पाहिजे,” संजय राऊतांची मोठी मागणी
हेही वाचा…रविंद्र तुपकरांना भाजपकडून ऑफर, पक्ष संघटना फोडण्याचं भाजपचं काम, राजु शेट्टींचा गंभीर आरोप
हेही वाचा…“तेव्हा जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप डोळे लावून ध्यान करत होता का ?”