मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर इंडियातील घटक पक्ष नाराज असल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दुर करावा अशी मागणी काॅंग्रेससहीत शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी केली. त्यावर आता शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा…“अमित शाहांवर हक्कभंग प्रस्ताव आणला पाहिजे,” संजय राऊतांची मोठी मागणी
भाजपसोबत शरद पवारांनी यावं, यासाठी अजित पवार गटाने खूप प्रयत्न केले, परंतु शरद पवार भाजपसोबत न जाण्याच्या विचारावर ठाम राहिले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नाव आणि चिन्ह याबाबत कायदेशीर लढाई सुरू आहे. शिवसेनेसंदर्भात निवडणुक आयोगावर दबाव आणून ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेण्यात आले तसा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…रविंद्र तुपकरांना भाजपकडून ऑफर, पक्ष संघटना फोडण्याचं भाजपचं काम, राजु शेट्टींचा गंभीर आरोप
दरम्यान, राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव घेण्याच्या दबावाला घाबरणार नाही. नाव आणि चिन्ह नसले, तरी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले जाईल. विचारधारेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे भाजपला साथ देण्याचा प्रश्नच येत नाही. लढून नव्याने पुन्हा सर्व काही उभे केले जाईल. असं शरद पवारांनी यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अॅक्शन! १०० कोटींचा पुन्हा घोटाळा उघड
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पुढील आठवड्यापासून सुनावणी घेणार
हेही वाचा…काॅंग्रेसने मोठी रणनीती आखली..! काॅंग्रेसचे सगळेच बडे नेते मैदानात उतरणार
हेही वाचा…मोदींनी जगभरात दौरे केले मग मणिपुरचा दौरा का नाही केला ?
हेही वाचा…विरोधकांनी नरेंद्र मोदींना घेरले, मणिपुरच्या मुद्यावरून अविश्वास प्रस्तावादरम्यान विचारले तीन प्रश्न