मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर आता पुढील आठवड्यापासून राहुल नार्वेकर याप्रकरणाबाबत सुनावणी घेणार आहेत.
हेही वाचा…“तेव्हा जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप डोळे लावून ध्यान करत होता का ?”
शिवसेनेच्या दोन्ही याचिकेवर आता राहुल नार्वेकर पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. त्यानुसार ठाकरे गटाच्या १४ आमदारांची सुनावणी सुरू होणार आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी लेखी उत्तर सादर केलं आहे. त्यामुळे या सुनावणीत आता काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“अहो, मर्सिडीज बॉय, तेव्हा नाही का सुचली टोल रद्द करण्याची उक्ती?” चित्रा वाघ यांनी ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाबाबत आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात पुढील आठवड्यापासून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसने मोठी रणनीती आखली..! काॅंग्रेसचे सगळेच बडे नेते मैदानात उतरणार
हेही वाचा…मोदींनी जगभरात दौरे केले मग मणिपुरचा दौरा का नाही केला ?
हेही वाचा…विरोधकांनी नरेंद्र मोदींना घेरले, मणिपुरच्या मुद्यावरून अविश्वास प्रस्तावादरम्यान विचारले तीन प्रश्न
हेही वाचा…“अमित शाहांवर हक्कभंग प्रस्ताव आणला पाहिजे,” संजय राऊतांची मोठी मागणी
हेही वाचा…रविंद्र तुपकरांना भाजपकडून ऑफर, पक्ष संघटना फोडण्याचं भाजपचं काम, राजु शेट्टींचा गंभीर आरोप