नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरिल अविश्वास प्रस्तावावर बोलतांना काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधींनी सभागृहात आक्रमक भाषण केलं. यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. परंतु यामध्ये राहुल गांधी बोलत असतांना संसदेतील कॅमेरा राहुल गांधी यांच्यावरून हटवण्यात आला. यावरून काॅंग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
हेही वाचा…“नव्याने लढून सर्व उभं करेन, पण भाजपला साथ देणार नाही,” शरद पवारांचं मोठं वक्तव्य
हुकूमशहा किती घाबरट आहे. खासदार राहुल गांधी लोकसभेत मणिपूरवर १५ मिनिटे ४२ सेकंद बोलले. या दरम्यान संसद टिव्हीवर ११ मिनिटे ८ सेंकद स्पीकर ओम बिर्ला यांनाच दाखवले गेले. राहुल गांधी यांना फक्त ४ मिनिटे दाखवण्यात आले. त्यानंतर इंडियातील विरोधी पक्षनेते सभागृहात बोलत असतांनाही त्यांच्यावरून कॅमेरा कमी वेळा दाखवण्यात येत आहे. तर भाजपच्या खासदारांवर संपुर्ण भाषण संपेपर्यंत दाखवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप काॅंग्रेससहित विरोधकांना घाबरत आहे का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अॅक्शन! १०० कोटींचा पुन्हा घोटाळा उघड
दरम्यान, नरेंद्र मोदी भारताचा आवाज ऐकत नाही, तर यांचा आवाज ऐकतात. हे बोलत असतांना खासदार राहुल गांधी यांनी सदनात हे फोटो दाखवले होते. मात्र त्याचवेळी संसद टिव्ही चा कॅमेरा स्पीकर ओम बिर्ला यांच्यावरच ठेवण्यात आला. संपुर्ण देशाला माहित आहे असे का झआले. मैत्री टिकवून ठेवण्यासाठी असंही काॅंग्रेसने म्हटलं आहे.
हुकूमशहा किती घाबरट आहे…
खा. राहुलजी गांधी लोकसभेत मणिपूरवर १५ मिनिटे ४२ सेकंद बोलले.
या दरम्यान @sansad_tv वर ११ मिनिटे ८ सेकंद स्पीकर ओम बिरला यांनाच दाखवले गेले.
खा. राहुलजी गांधी यांना फक्त ४ मिनिटे दाखवले.
हे आहे खरं @sansad_tv !
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“दुसऱ्यांची राज्य म्हणजे शत्रू राज्य समजणारी भाजपची चाणक्यनिती”
हेही वाचा…“राहुल गांधींनी प्लाईंक किस दिला, स्मृती ईंराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप”
हेही वाचा…“नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना, अमित शहा अडाणी, हे मेघनाथ अन् कुभंकर्ण,” राहुल गांधींचा हल्लाबोल
हेही वाचा…“शरद पवारांमध्ये पंतप्रधान पदाची क्षमता, परंतु…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं भाष्य
हेही वाचा…“वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात शेलारांच्या विरूद्ध खटला चालवणार का?” कोर्टाचा पोलिसांना सवाल