मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर आता पुढील आठवड्यापासून राहुल नार्वेकर याप्रकरणाबाबत सुनावणी घेणार आहेत. यावर वकिल असीम सरोदे यांनी मोठं भाष्य केले आहे.
हेही वाचा…“शरद पवारांमध्ये पंतप्रधान पदाची क्षमता, परंतु…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं भाष्य
शिवसेनेच्या दोन्ही याचिकेवर आता राहुल नार्वेकर पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. त्यानुसार ठाकरे गटाच्या १४ आमदारांची सुनावणी सुरू होणार आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी लेखी उत्तर सादर केलं आहे. त्यामुळे या सुनावणीत आता काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात शेलारांच्या विरूद्ध खटला चालवणार का?” कोर्टाचा पोलिसांना सवाल
दरम्यान, शिवसेनेचे १६ आमदार अपात्र होणार आणि त्यांच्याबरोबर गेलेलेही आमदार अपात्र होणार आहे. त्यामुळे अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहेत. एका आमदाराला एक वकिल दिला जाऊ शकतो, म्हणजे १६ वकिल बाजू मांडतील. वेळ काढण्याचं अध्यक्ष काम करीत आहेत. नैतिकतेला धरून संविधानाला धरून अध्यक्षांची कृती नाही. राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा. असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, मोदींच्या ‘त्या’ विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची टिका
हेही वाचा…भाजपचा दुपट्टीपणा उघड…! राहुल गांधी संसदेत बोलत असतांना कॅमेरा हटवला
हेही वाचा…“दुसऱ्यांची राज्य म्हणजे शत्रू राज्य समजणारी भाजपची चाणक्यनिती”
हेही वाचा…“राहुल गांधींनी प्लाईंक किस दिला, स्मृती ईंराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप”
हेही वाचा…“नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना, अमित शहा अडाणी, हे मेघनाथ अन् कुभंकर्ण,” राहुल गांधींचा हल्लाबोल