पुणे : शिवसेनेच्या एका जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त दाखवण्यात आली. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यातच कोल्हापुर येथील शासन आपल्या दारी फडणवीसांचं कान दुखत असल्याचं सांगत त्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. त्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…शिंदे-फडणवीस वाद पालघरला पोहचला, एकाच गाडीतून जाण्यास फडणवीसांचा नकार
अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी कानदुखीची प्रमुख कारणे,१)”भाऊ फक्त तुम्हीच” हे ऐकायला वारंवार आलेले फोन उचलणे २) टक्केवारीचा आकडा कानाला गोड न लागणे ३) स्वरचित कवण “मी पुन्हा येईल” यात मोठे फेरबदल होणे ४) “काना मागून आले आणि तिखट झाले “ही मराठी म्हण प्रत्यक्षात कानातून मनात उतरणे. असं म्हणत भिंतीला कान असतात. असाही टोला हाणला आहे.
हेही वाचा…“सुवर्णा करंजेंनी संजय राऊतांच्या भोंग्याला खरी जागा दाखवली”, नरेश म्हस्केंचा राऊतांवर हल्लाबोल
दरम्यान, शिवसेनेच्या जाहिरातीवर फडणवीस नाराज असल्याने कोल्हापुर येथील कार्यक्रमाला गेले नसल्याचं विरोधकांनी म्हटलं तर फडणवीसांचं कान दुखत आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टारांनी हवाई प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याचं मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यावरून महायुतीत मिठाचा खडा पडला का ? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
कानदुखीची प्रमुख कारणे -१)”भाऊ फक्त तुम्हीच” हे ऐकायला वारंवार आलेले फोन उचलणे २) टक्केवारीचा आकडा कानाला गोड न लागणे ३) स्वरचित कवण “मी पुन्हा येईल” यात मोठे फेरबदल होणे ४) “काना मागून आले आणि तिखट झाले “ही मराठी म्हण प्रत्यक्षात कानातून मनात उतरणे.😄भिंतीला कान असतात #उलटाचष्मा pic.twitter.com/3xkkRdKDF4
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईची घटना, अन् पुण्यातल्या ताईं एकमेकांमध्ये भिडल्या,” सुप्रिया सुळे-चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार
हेही वाचा…“एकमेकांच्यामध्ये कशाला अंतर पाडण्याचा प्रयत्न करताहेत”,शिंदे-फडणवीसांच्या नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले
हेही वाचा…“हे फेविकॉल का जोड है..! तुटेगा नही..! आमची जोडी जयविरूसारखी”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…नाराजीच्या चर्चा, फडणवीसांची विरोधकांना चपखल, “तुम्ही आमच्या प्रवासाची चिंता करू नका”
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्याचं नात नवरा-बायकोसारखं, त्यांना समाजाला घाबरून ‘घटस्फोट’ घेता येत नाही”