मुंबई : महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यानुसार, काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून भाजपनं संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे आज आपला अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. रजनी पाटली यांनी “मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते”,अशा भावना व्यक्त केल्या. भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार अशा भावना रजनी पाटील यांनी व्यक्त केल्या.
दिल्लीत जेवणाच्या टेबलवर उद्धव ठाकरे शहांच्या बगलमध्ये; एकमेकांच्या बाजूला बसून नेमकं काय शिजलं?
मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते, अशा भावना रजनी पाटील यांनी व्यक्त केल्या. सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला,दिल्लीत मला आशीर्वाद मिळाले. राज्यातून देखील अनेकांनी पुढाकार घेऊन ही मला संधी मिळाली, असं पाटील यांनी म्हटलं.
नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या – उद्धव ठाकरे
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी समजूतदारपणानं भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला त्यांचे ही आभार मानते, असं रजनी पाटील यांनी म्हटलं. नुकतंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आता काँग्रेसची विनंती भाजपने मान्य केली.
आम्ही ठरवलंय, ठाकरे सरकारचा ऑटो पंक्चर करायंचा अन् बदलाय घ्यायचा – भाजप
महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली होती. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं होतं. आज अखेर चार दिवसांनंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भाजपने जाहीर करुन काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.
Read Also :
- मोठी बातमी: अखेर भाजप- मनसे एकत्र आले; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात फुटला युतीचा नारळ
- अडसुळ अडकले, आता हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही; किरीट सोमय्याचा दावा
- राष्ट्रवादीच्या नेत्याची ऑफिसमध्येच आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
- आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा ‘या’ दिवशी; राजेश टोपेंनी सांगितली तारीख
- राजसाहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला