नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण केलं. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्गम भागात नवीन पोलीस पोस्ट स्थापन करणे, नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणे, नवीन शाळा बांधण्यावर भर देणे आदींसाठी हा निधी लागणार आहे. त्याबाबतचे सादरीकरणच मुख्यमंत्र्यांनी शहांना दिलं.
ज्ञानाची दारं ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला उघडणार; थिएटरचे दर्शन मात्र २४ ऑक्टोंबरला मिळणार
दरम्यान, या बैठकीला उद्धव ठाकरेंशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित आहेत. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनगमोहन रेड्डी, केरळचे मुख्यमंत्री ओमाना चांडी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Read Also :
- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार; अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राऊतांची गर्जना
- शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरलं होताचं भाजप आमदाराचा फोन झाला ‘स्विच ऑफ’
- दिल्लीत अमित शहांसोबत उद्धव ठाकरेंची महत्त्वाची बैठक सुरू; पोलीस महासंचालकही हजर
- हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा; किरीट सोमय्या खवळले
- पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल