मुंबई : मुंबईतील अदाणींचा असलेला धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाने शनिवारी भव्य मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. यावरून आता राज्यात सत्ताधारी भाजप आणि ठाकरे गटांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे.
हेही वाचा…हॉर्स रायडिंग मैदानाची ‘रेस’ : ते आले…त्यांनी भेट दिली…जिंकून गेले सारे! खासदार अमोल कोल्हे यांना ‘राजकीय मायलेज’
राज ठाकरे म्हणाले की, मोठा प्रकल्प मुंबईत येतोय, तो मुळात परस्पर अदाणींना का दिला इथपासून सुरूवात होते. अदाणींकडे असं काय आहे, ज्यात विमानतळ, कोळसा वगैरे तेच हाताळू शकतात. एवढ्या मोठ्या प्रक्लपाला टेंडर्स मागवायला पाहिजे होतं. तिथं काय होणार हे कळायला पाहिजे होतं. अदाणी ग्रुपची डिझाईन दाखवा असं म्हटलं होतं. महाविकास आघाडीला आज का जाग आली. सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का ? टाऊन प्लानिंग नावाची गोष्ट सांगावी लागते. एक भाग घ्यायचा आणि सांगायचं हा भाग अदाणींचा द्यायचा असं नसतं. ८ ते १० महिन्यांनी महाविकास आघाडीला जाग आलीय. मोर्चाचा दबाव आणून सेंटलमेंट करायचीय. असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
हेही वाचा...राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष, असे आजपर्यंत कुणी हिणवलं ? फडणवीसांना शरद पवार गटाचा तिखट सवाल
दरम्यान, धारावीतील सर्व निवासी- अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा. निवासी झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्या, टीडीआरसाठी सरकारनं स्वत: ची कंपनी नेमावी. पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतींमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर मोफत, नव्यानं सर्वेक्षण करा. निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करावा. प्रकल्पाचं स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या, शाहू नगर लेबर कॅम्पमधील रहिवाश्यांना ७५० चौरस फुटांची घरे द्या, अशा मागण्या ठाकरे गटाकडून ठेवण्यात आल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय”, राऊतांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा...सलीम कुत्ता प्रकरणाबाबत राजकीय हालचाली वाढल्या ; ठाकरे गटातील नेत्याच्या अडचणी वाढल्या
हेही वाचा…विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतर काॅंग्रेस पुन्हा कामाला लागली, दिल्लीत २१ तारखेला महत्वाची बैठक
हेही वाचा…“शिवसेनेचा वाघ येतोय..,”अदानी विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या ?
हेही वाचा…ठाकरेंच्या मोर्चासाठी जालन्यातील युवक पेटती मशाल घेऊन मुंबई दाखल, मोर्चाला थोड्याच वेळात होणार सुरूवात