कोल्हापूर : महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. माजी खासदार राजू शेटटी यांचे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल इथल्या महावितरणचे कार्यलय पेटविले आहे.महावितरणचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवून लावण्यात आले आहे. छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक बंब आणून आग आटोक्यात आणण्याचा महावितरणने प्रयत्न केला. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात आंदोलनाची भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल बाकी, तो आला की…; चंद्रकांत पाटीलांचा इशारा
शेतीला दिवसा सलग 10 तास वीजपुरवठा करावा, अन्यायी वीज बिल वसुली थांबवावी, शेतीपंपाची चुकीची वीज बिले तातडीने दुरूस्त करावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर महावितरण कंपनीच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार – चंद्रकांत पाटील
आंदोलनाचा काल दुसरा दिवस होता. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे रात्रभर महावितरण कार्यालयासमोर झोपून होते. दरम्यान महावितरणला जागं करण्यासाठी मी कोल्हापुरात आंदोलन करतोय. तर स्वाभिमानीच्या इतर कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यात महावितरण कार्यालयासमोर शांततेने आव्हान करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
Read also:
- रशिया- युक्रेन युद्ध सुरू; पुतिन म्हणाले, युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे टाकावीत, अन्यथा..;
- भाजपाचं ठरलंय… नो परफॉर्मन्स… नो तिकीट: त्यामुळेच अस्वस्थांची पळापळी…!
- लगा लेना ED से लेकर CBI तक का जोर, लढेंगे और जितेंगे भी; मलिकांच्या समर्थनार्थ मुंबईत जोरदार बॅनरबाजी
- नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर नाचवल्या तलवारी
- दिवाळीनंतर फटाके फोडू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं मालिकांच्या अटकेचं संपूर्ण स्पष्टीकरण