पुणे : भल्या पहाटे इडीची धाड आणि चौकशी केल्यानंतर आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना इडीने अटक केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलाचं तापलेलं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपला करारा जवाब मिलेगा असा इशारा देण्यात येतो तर तुम्हाला कारवाई बाबत शंका उपस्थित झाली असेल तर न्यायालयात जा असा भाजपाकडून सुर बघायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात आता नवा वाद सुरू आहे.
…म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल
खासदार संजय राऊत यांनी मागील काही दिवसांपूर्वी इडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात संजय राऊत, किरीट सोमय्या, आणि नारायण राणे हा वाद सुरू झाला होता. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप लावल्यानंतर त्यांच्यावर इडीकडून कारवाई करण्यात आली आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
…त्यामुळे किशोरी ताई यांचे आभार? नितेश राणेंनी पुन्हा मुंबईच्या महापौरांना डिवचले
चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले की, भाजप सुड्याच्या भावनेतून कारवाई करत आहे. असा आरोप महाविकास आघाडी करत आहे, तर नवाब मलिक दोषी नसतील तर त्यांनी कोर्टात जावं असे भाजप नेते सांगत आहेत.मात्र नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणारच, कारण जर मलिक डी गँगशी संबंध असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
…तर नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा; किरीट सोमय्यांची सरकारकडे मागणी
तसेच ते पुढे म्हणाले की, 1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल अजून बाकी आहे. हा बाहेर आल्यास आज जे बोलत आहेत त्यांची बोलती बंद होईल. मात्र जर तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा, तिथे तुम्हाला योग्य न्याय मिळेल. तसेच या प्रकरणात चौकशी सुरू असल्यामुळे आधिक बोलणं योग्य नाही. तुम्ही न्यायालयाचे दार ठोठवा, तसेही तु्म्ही अनेक केसेस हरले आहात आसा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
Read also:
- मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हाही…; नवाब मलिकांवर ईडीच्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
- भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला! भाजपा नेत्याचा नवाब मलिकांना टोला
- कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही; राष्ट्रवादीचा सूचक इशारा
- मोठी बातमी: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक, महाविकास आघाडीला मोठा धक्का
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसोबत लबाडी करत आहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप