मुंबई : देशातील अन्य राज्यांमध्ये निर्बंध कठोर करण्यात आल्याने राज्यातही करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कोणते उपाय योजता येईल याबाबत चर्चा झाली. दरम्यान निर्बंध कडक करताना मुंबईची लाईफलाइन असणारी लोकल पुन्हा बंद होणार का? यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे.
… अनाथांची मातृदेवता हरपली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही असं स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणता विचार नाही अशी माहिती दिली. तसंच तूर्तास लॉकडाउन लावण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार केला.
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये रोज चर्चा करतात. रोज सकाळी ७ वाजता त्यांची फोनवर सविस्तर चर्चा होते. यामुळे त्यांना निर्णय घेण्यासही मदत होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अधिकची माहिती घेतली असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि शरद पवार चर्चेतून घेतील आणि त्याची अमलबजावणी आम्ही करु असं ते म्हणाले. लसीकरण वाढवलं पाहिजे यावर एमकत झाल्याची माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली.
आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी
सार्वजनिक कार्यक्रम, लग्नं यासंबंधीच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी झाली पाहिजे. करोनाची रुग्णसंख्या नियंत्रित कशी करता येईल यासंबंधी शरद पवारांनी माहिती घेतली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. शरद पवारांनी आरोग्य विभागाकडून परिस्थिती समजून घेतली. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि नाही कराव्यात यासंबंधी माहिती घेतली असं ते म्हणाले. यावेळी त्यांना लॉकाडउन, नाईट कर्फ्यू लावणार का? असं विचारण्यात आलं असता म्हणाले की, “या सर्व पर्यायांवर चर्चा झाल्या आहेत, मात्र त्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील”.
Read also:
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार; परळी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
- काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, पटोलेंना डावलून थेट दिल्लीत जाणार?
- परदेशातून आलेल्या नागरिकांची पुणे विमानतळावर होणार आरटीपीसीआर चाचणी.!*
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
- बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं