मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत यांच्यात सध्या कमालीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राणे कुटुंबीय आणि ठाकरे सरकार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर टीका केली होती. आणि इथूनच पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे वादास सुरुवात झाली.
पुणे महापालिकेतील 6000 कोटींचा संशयास्पद व्यवहार; राष्ट्रवादीची एसीबीकडे तक्रार दाखल
किरीट सोमय्या हे आता कोकण, अलिबागचा दौरा करणार आहे. रश्मी ठाकरे यांचे अलिबागमधील कोर्लई गावात १९ बंगले आहेत आणि ते सिद्ध करण्यासाठी मी अलिबागला जाणार असं सोमैयांनी म्हटलं होतं. आता ते कोर्लई गावाच्या दिशेनं निघालेले आहेत. ते पोहोचायच्या आधीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथील ‘अधिश’ या बंगल्याची अंतर्गत तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे.
हिंदुस्थानी भाऊ’ला अखेर सशर्त जामीन मंजूर, काय आहे नेमकं प्रकरणं… वाचा सविस्तर…
बंगल्याच्या आतील काही बांधकाम विनापरवाना करण्यात आले आहे का? याची मुंबई महापालिका लवकरच पहाणी करणार आहे.नारायण राणेंच्या अधिश बंगल्याबाबत बांधणीसाठी सादर केलेल्या प्लॅनमध्ये बदल करत बंगल्याचे बांधकाम करण्यात आल्याची तक्रार महापालिकेला २०१७ मध्ये मिळाली होती. या बंगल्याचे बांधकाम हे ‘सीआरझेड’चे उल्लंघन असल्याबाबतची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे आणि आता आरोप-प्रत्यारोपांमध्ये एकमेकांची उणीदुणी काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे असं महाराष्ट्रात सध्या दिसत आहे.
Read also:
- टीका करतात आणि कोकणात येऊन पडतात; उदय सामंतांचा नाव न घेता राणेंवर प्रहार
- “विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा”आमदार महेश लांडगे
- शिवसेनेवर शोककुळा: जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींच राहूल गांधींना पत्र
- अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार – चंद्रकांत पाटील