मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत यांच्यात सध्या कमालीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राणे कुटुंबीय आणि ठाकरे सरकार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर टीका केली होती. आणि इथूनच पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे वादास सुरुवात झाली.
पुण्यात शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या; उपनेता कुचिक यांच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा
केंद्रीय मंत्री नारायण राणे संजय राऊत यांच्यासह शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मिलिंद नॉर्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच बॉय आहेत आणि वरवरचे काम करत असतात असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
पुणे महापालिकेतील 6000 कोटींचा संशयास्पद व्यवहार; राष्ट्रवादीची एसीबीकडे तक्रार दाखल
आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणेंना याबाबत उत्तर दिलं आहे. देशात काहीजण नेहमीच इतरांवर टीका करून राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. जे टीका करत देशात वातावरण निर्मिती करत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात असा सणसणीत टोला राणेंचे नाव न घेता उदय सामंत यांनी हाणला आहे. मी काही चुकत असेल तर टीका करणाऱ्याने माझ्या विधानसभेत येऊन उभे राहून निवडून येवून दाखवावे, असे खुले आव्हानही केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिले. आता मंत्री उदय सामंत यांच्या टीकेवर भाजपच्या नेत्यांकडून काय उत्तर येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Read also:
- “विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा”आमदार महेश लांडगे
- शिवसेनेवर शोककुळा: जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींच राहूल गांधींना पत्र
- अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार – चंद्रकांत पाटील
- हिंदुस्थानी भाऊ’ला अखेर सशर्त जामीन मंजूर, काय आहे नेमकं प्रकरणं… वाचा सविस्तर…