नागपुर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या नागपुरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार सध्या शिवसेनेच्या खासदारांचा शिवसंपर्क अभियान सुरू आहे. त्यानिमित्ताने संजय राऊत यांचे नागपुर विमानतळावर कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद म्हणजे पक्षाचे संघटन आहे, त्यासाठी संघटनेचा पाया मजबुत असणं, हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्वाचं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांवरून भाजपला टोला लगावत संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत आहेत. हे सर्वांना माहिती आहेच. यातुन काय बोध घ्यायचा , तो जनता घेईलच. नागपुर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपुरकरांना मुंबई प्रिय आहे. तर आम्हा लोकांना नागपुर प्रिय आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करावे असं पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं. त्यामुळे संपुर्ण विदर्भावर लक्ष ठेवण्यासाठी मी नागपुरात थांबणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपचे वरचे नेते अनुकुल मात्र..; पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने सतेज पाटलांची प्रतिक्रिया
गोवा आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाही. त्यावरून भाजपने त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करत डिवचण्याचा प्रयत्न केला. अशातच आता आज शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक पार पडली होती. त्यात 22 मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
मग तुमच्या सरकारच्यावेळी महाराजांचा विधानसभेत फोटो का नाही लावला? अजित पवारांचं भाजपला प्रत्युत्तर
दिल्लीत पार पडलेल्या बैठकीबाबत संजय राऊत म्हणाले होते की, आज शिवसेना खासदारांची नवी दिल्लीत बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार आम्ही दिल्लीत एकत्र जमलो होतो. या बैठकीत संघटनात्मक बाबींबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच आम्ही संपुर्ण महाराष्ट्रात 22 मार्चपासून शिवसेनेेचे शिवसंपर्क अभियान सुरू करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Read also:
- ” हिंदुत्वातलं जाज्वल्य सोडलं अन् सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवलं “
- नवाब मलिकांना अजून एक न्यायालयाचा दणका; दिलासा नाहीच
- “शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी”
- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
- 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल