मुंबई : दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधीत मनी लॉन्ड्रिंग केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. कित्येक दिवस होऊन देखील त्यांनी अद्यापही दिलासा मिळालेला नाही. अशातच आता विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांची 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जमीन व्यवहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
मग तुमच्या सरकारच्यावेळी महाराजांचा विधानसभेत फोटो का नाही लावला? अजित पवारांचं भाजपला प्रत्युत्तर
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना अटक झाली आहे. त्यांच्यावर हसिना पारकर यांच्या मालिकीची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी 300 कोटींची जमीन केवळ 55 लाखांना खरेदी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दहशतवादी आणि 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपांशी संबंध असून मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.
ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं सरकार; तथाकथित रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ कडाडल्या
इडीने त्यांना अटक केल्यानंतर सुरूवातीला आठ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची कसुन चौकशी करण्यात आली. विशेष न्यायालयाने मग 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. अशातच आता विशेष न्यायालयाने त्यांची 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने राज्यात आक्रमक भूमिका घेतली होती. तर सत्ताधारी पक्षाने नवाब मलिकांना भक्कम पाठिंबा दर्शविला. अशातच आता आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत याचं काय परिणाम होईल,ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी”
- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
- 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल
- मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका
- भाजपचे वरचे नेते अनुकुल मात्र..; पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने सतेज पाटलांची प्रतिक्रिया