नागपूर : आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाल्याचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. त्यांनी आज ‘मुंबई तक’ला सविस्तर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसबाबत आणि देशातील एकूण राजकीय स्थितीबाबत भाष्य केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी आजच्या काँग्रेसची अवस्था – शरद पवार
‘काँग्रेसनं अनेकांना जमीनी राखायला दिल्या. त्यांनीच जमीन चोरली, डाका टाकला. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल. बाकी दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया द्यायला नको,’ असं म्हणत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना टोला लगावला आहे. तसेच, ‘२०२४ ला काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार,’ असाही दावा त्यांनी केला आहे.
ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच बाप्पा चरणी प्रार्थना – देवेंद्र फडणवीस
तसेच, ‘काँग्रेस जमीनदारांचा पक्षच नाही. काँग्रेसनं जमीनदारी केलेली नाही. काँग्रेसनं ज्यांना शक्ती दिली, त्यांनीच काँग्रेसचा घात केला. पण सामान्य जनता काँग्रेससोबत आहे. सध्या सगळीकडूनच काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र तो आम्ही चालू देणार नाही. आगामी लोस्कभ निवडणुकीतून काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल,’ असा विश्वास दर्शवत, ‘पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही.’ असं ते म्हणाले.
शरद पवारांनी केलेलं करेक्ट वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय; फडणवीसांचा परफेक्ट निशाणा
‘पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल काहीही वक्तवव्य करणं, मी टाळतो. पण त्यांनी पक्षावर वक्तव्य केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पवार साहेब हे रिमोट कंट्रोल आहेत. त्यामुळे, हे सरकार अगदी सुरळीत चालवणे ही त्यांची जबाबदारी असून, हे सरकार कसं चालवायचं हे त्यांच्याच हातात आहे,’ असा इशारा त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशाराच दिला आहे.
Read Also :
- ‘हे’ दोन बडे नेते करत आहेत भाजप-शिवसेनेतले अंतर कमी? चर्चांना उधाण
- आधी डरकाळी फोडली, आता नरमाईचा सूर? राणे तीनच दिवसांत पलटले
- शिवसेनेला अजून एक धक्का : माजी खासदार आनंदराव अडसूळ, मुलगा, जावयाकडे ईडीच्या धाडी
- लूकआऊट सर्क्युलरनंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, दिला ठाकरे सरकारला इशारा
- गिरीश महाजन म्हणाले, ‘ती माझी चूक झाली, मी मान्य करतो’