मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या स्थितीबाबत आपली भूमिका मांडली त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे. शरद पवारांनी केलेले वर्णन हे काँग्रेससाठी चपखल लागू होणारे आहे. काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस पक्षावर फडणवीसांनी निशाणा साधला आहे.
चिपी विमानतळ उद्घाटन, राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांची गरज काय? भाजप नेते म्हणतात…
मला असं वाटतं काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन हे दुसरं असूच शकत नाही. कारण काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय. असं म्हणतात की, मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजरान चाललं आहे तशा प्रकारचंच वर्णन शरद पवारांनी केलं आहे. पवार यांनी केलेले वर्णन चपखल लागू होणारे आहे.
चिपी विमानतळ श्रेयवादावरून राजकारण तापलं, पुन्हा पाहायला मिळणार राणे-मुख्यमंत्री संघर्ष?
मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी काँग्रेस पक्षाबाबत आपली भूमिका मांडली. शरद पवारांनी म्हटलं होतं की, “उत्तरप्रदेशातल्या जमीनदारांकडे मोठी शेती आणि हवेली होती पण लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्या जमीनी गेल्या आणि हवेली राहिली. जुनी झालेली ही हवेली दुरुस्त करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन 15-20 एकरावर आली. सकाळी उठून जमीनदार हवेलीच्या बाहेर बघतो तेव्हा त्याला समोर हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व पीक माझं होतं असं सांगतो. पण आता नाही. काँग्रेसची अवस्था जमीन नसलेल्या जुन्या जमीनदारासारखी झाली आहे.
‘हे’ दोन बडे नेते करत आहेत भाजप-शिवसेनेतले अंतर कमी? चर्चांना उधाण
शरद पवारांनी पुढे म्हटलं, काँग्रेस एकेकाळी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होती, पण आता तसं नाही, हे मान्य केलं पाहिजे. तेव्हा विरोधी पक्षांची जवळ यायची प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेसची दूरावस्था झाली असली तर तो पक्ष आजही रिलिव्हन्स असलेला पक्ष आहे. ”
Read Also :
- आधी डरकाळी फोडली, आता नरमाईचा सूर? राणे तीनच दिवसांत पलटले
- ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच बाप्पा चरणी प्रार्थना – देवेंद्र फडणवीस
- उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी आजच्या काँग्रेसची अवस्था – शरद पवार
- शिवसेनेला अजून एक धक्का : माजी खासदार आनंदराव अडसूळ, मुलगा, जावयाकडे ईडीच्या धाडी
- गिरीश महाजन म्हणाले, ‘ती माझी चूक झाली, मी मान्य करतो’