मुंबई : ९ ऑक्टोबरला १२:३० वा. चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. याला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित राहणार असून, या निमित्ताने पहिल्यांदाच राणेंच्या अटक ‘कार्यक्रमा’नंतर ठाकरे आणि राणे आमने-सामने येणार आहेत. मात्र, त्याआधीच राणेंनी, ‘या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हवेत कशाला?’ असा सवाल करत वातावरण तापवलं आहे.
भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
मंगळवारी राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत, ‘९ ऑक्टोबरला विमानतळाचे उद्घाटन होईल’, असं जाहीर केलं. तसेच त्यांनी, ‘ज्योतिरादित्य सिंधिया विमानतळाचं उद्घाटन करतील. मुख्यमंत्री हवाच असं काही नाही,’ असं विधान केलं. दुसरीकडे, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी, विमानतळाचं उदघाटन ७ ऑक्टोबरला होईल, असं म्हटलं. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी आपल्याचमुळे विमानतळ सुरू होत असल्याचा दावा केल्याने, त्यांच्यात श्रेयवादावरुन चांगलेच राजकारण रंगायला लागलं.
सुनेच्या गंभीर आरोपानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
त्यांनतर आज पुन्हा विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, विमानतळ उदघाट्नचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. यावेळी त्यांनी, ‘कालच मुख्यमंत्री आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात चर्चा झाली. यावेळी उद्घाटनाचा दिवस दोघांनी चर्चा करून ठरवला. त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी मला ९ तारीख फिक्स झाल्याचा फोन केला,’ असं सांगत, ‘मुख्यमंत्र्यांना बोलवायचं की नाही, याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, ते कोण लागून गेले आहेत? असा सवाल त्यांनी केला.
पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
तसेच, “मुख्यमंत्र्यांनी यासाठी ४ बैठका घेतल्या, ४ हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत ७ वर्षात वेळोवेळी बैठका घेतल्या. हे विमानतळ राज्याच्या MIDC अधिकार क्षेत्रात येते. केंद्र सरकार फक्त लायसन्स देण्याचं काम करते. त्यामुळे, राणेंना याचे श्रेय घेता येणार नाही. त्यांनी फुशारकी मारताना भान ठेवावं, इतकी वर्षे राणे कोठे होते? असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडे, राणेंनी हे विमानतळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याचाच दावा केला आहे.
Read Also :
- “तुम्ही मराठी माणसाला सत्तेसाठी वाऱ्यावर सोडलं,” राऊतांवर भाजपचा पलटवार
- “बेळगावला महाराष्ट्रात घेण्याचा ठराव संमत करून दाखवा!” राऊतांचं भाजपला आव्हान
- मोठी बातमी! ठाकरे सरकारची पोलखोल करणाऱ्या सोमैय्यांना आता ‘Z’ दर्जाची सुरक्षा
- ‘या’ अधिकाऱ्यावर होती हिरेनच्या हत्येची जबाबदरी, NIA च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
- विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी