मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी, “काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढवणार, असे वक्तव्य केले होते. तसेच, जर संधी मिळाली, तर मुख्यमंत्री पदासाठी देखील आग्रही राहीन,” असंही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर त्यांनी दिल्ली दरबारी उपस्थिती लावली आणि त्यानंतर त्यांनी स्वबळाची भाषा बाजूला ठेवून, जेव्हा निवडणूका येतील, तेव्हा परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल,” अशी मवाळ भूमिका घेतली.
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
त्यानंतर आज परत एकदा त्यांनी, आपल्या आक्रमक भूमिकेत येत, ‘‘मला खुर्चीची चिंता नाही, याआधी खासदारकी सोडली, विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची सोडली. त्यामुळे, यापुढेही कधी मला खुर्चीची अपेक्षा राहणार नाही,” असं सांगत पक्षाबद्दलची आपली निष्ठा मांडली आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी आ. संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर
दरम्यान, पटोलेंच्या ‘त्या’ विधानांमुळे, महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला होता. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी याबाबद्दल खासगीत आणि अनेकदा अप्रत्यक्षपणे जाहीररीत्याही काँग्रेसवर यावरून जोरदार टीका होती.
आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते, थोरातांच्या कन्येची पडळकरांवर टीका
तसेच, पटोलेंच्या ‘त्या’ विधानांमुळे, त्यांना पक्षातूनही काही प्रमाणात विरोध असल्याचे चित्र रंगवले जात होते. या पार्श्वभूमीवर, आज मुंबईतील टिळक भवनात, पार पडलेल्या कार्यक्रमात ‘बंजारा टायगर संघटना’ काँग्रेसमध्ये विलीन झाली. त्यावेळी पटोले यांनी, नव्या कार्यकर्त्याचे स्वागत करताना, पक्षाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, नवकार्यकर्त्यांना ताकद देण्याचा शब्द दिला.
Read Also :
- आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेते असतानाही त्यांना ना उपमुख्यमंत्रीपद ना प्रदेशाध्यक्ष पद!
- कन्येने दिले उत्तर, “पात्रता पेक्षा जास्त मिळालं की असं होतं”; आता पडळकरांचे प्रत्युत्तर
- आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध?; अजित पवार
- ‘राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांचा खोटारडेपणा अखेर उघड; त्या बैठकीचे निमंत्रण दोन तासआधी WhatsApp वर
- पुणे महापालिकेतील २३ गावांबद्दल महत्वपुर्ण निर्णय; शाळा, जमिनी, अंगणवाड्यांचा असा होणार बदल