मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. सिंधुदुर्गातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नारायण राणे उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात अनेक प्रश्न आहेत. मात्र या साकारला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे,अशी टीका राणे यांनी केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या तब्बल 800 शाळा अंधारात; निम्याहून अधिक शाळा सुप्रिया सुळेच्या मतदारसंघात
त्रिपुरा घटनेचे पडसाद राज्यात घडले. ठिकठिकाणी दंगली उसळल्या. मात्र या घटनेचे खापर भाजपवर फोडण्यात आले. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे, असेही राणे म्हणाले .
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी निधी जाहीर करण्यात आला. मात्र जाहीर केलेल्या निधीमधून कमी निधी देण्यात आला. जिल्ह्याचा विकासा फंड हा दिवसे न् दिवस कमी होत आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फक्त 9 टक्के खर्च झाला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते. . जिल्ह्यात वादळ आलं, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. जिल्हा नियोजनाची बैठक ही फक्त नावापुरतीच आहे. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असे ठाकरे सरकारचे धोरण असल्याचे राणे म्हणाले . जिल्हा परिषदेसाठी सरकारने 46 कोटी रुपये दिले होते. मात्र, विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून तो निधी परत मागवून घेतला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारने झाकीर नाईकचा फास आवळला, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षासाठी बंदी
Read Also :
- ठाकरे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं, पडळकरांचा घणाघात
- नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल
- हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल
- अमरावती दंगल घडवण्यामागे मंत्री नवाब मलिकांचा हात
- सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीच्या नेत्याने नाना पटोलेंना ठणकावलं