मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. मुस्लिम समाजाने काढलेल्या निषेध मोर्चात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केल्यानंतर आत हाजी अराफात यांनी मलिकांवर पलटवार केला आहे. अमरावती दंगलीमागे नवाब मलिकांचाच हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा
अमरावती दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात आहे. मलिक यांनी मुंबईतून पैसे पोहोचवण्याचं काम केलं. नवाब मलिक यांचे रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरींसोबत जुने संबंध आहेत. त्यांनीच ही दंगल घडवून आणली, असा गंभीर आरोप हाजी अराफात यांनी केलाय. सईद नुरीसोबत, रझा अकादमीसोबत फोटो जोडण्याचं काम केलं. हा फोटो हजरत नईम यांच्या घरी, मदरसा आणि मशिदीतला आहे. महाविकास आघाडीचे सगळेच मोठे नेते तिथे जातात. जेव्हा जेव्हा एनसीपीचं सरकार आलं तेव्हा सईद नुरी बिळातून बाहेर येतो. भिवंडी, आझाद मैदान सगळ्या दंगलीत त्यांचंच नाव आहे. नवाब मलिक आणि सईद नुरींचे फोटो पाहा. हल्लीच काही कार्यक्रम झाले त्यात हे दोघे एत्रक आल्याचं सांगत अराफात यांनी मलिक आणि नुरी यांचा फोटोही दाखवला.
केंद्र सरकारने झाकीर नाईकचा फास आवळला, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षासाठी बंदी
रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू असेल तर उद्धव ठाकरे रझा अकादमीच्या लोकांसोबत कसे? असा सवालही अराफात यांनी केलाय. ही दंगल भाजपनेच घडवली याबाबत मलिक यांच्याकडे काही पुरावे आहेत का? मलिकांना आव्हान आहे की सईद नुरीला विचारा नाहीतर मोईन यांना विचारा की फोटो कुठला, असंही अराफात म्हणाले. खिलाफत हाऊसला काय बैठक झाली ती नवाब मलिकांनी राज्याला सांगावं, शरद पवार यांनीही सांगावं, असं आव्हान देतानाच नवाब मलिकांचा राज्यात दंगलीचा इरादा आहे. हिंदू संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोपही अराफात यांनी केलाय.
Read Also :
- सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीच्या नेत्याने नाना पटोलेंना ठणकावलं
- काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जुंपली; भाई जगतापांची थेट सोनिया गांधीकडे तक्रार
- ‘प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध व्हावी’; बाळासाहेब थोरात करणार भाजपशी चर्चा
- “बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”
- ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक