मुंबई : अलीकडेच राज्यात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. त्रिपुरामध्ये मशिदीची नासधूस करण्यात आली, असा दावा करुन हे मोर्चे निघाले होते. या मोर्चांमध्ये हिंसाचार झाला होता. त्याचवरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.
“अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा
“सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले होते. हा पोलरायझेशनचा प्रयोग आहे. निवडून निवडून हिंदुंची दुकान तोडली, जाळली. त्यावर कोणी बोललं का? ज्यावेळी हिंदुंची दुकानं जाळली गेली, त्यावर महाविकास आघाडीचा एकतरी नेता बोलला का? मविआ नेत्यांची तोंड शिवली होती का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
केंद्र सरकारने झाकीर नाईकचा फास आवळला, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षासाठी बंदी
पुढे ते म्हणाले की, पाच वर्षे आपलं सरकार होतं. आपल्या सरकारच्या काळात कशावर चर्चा व्हायची? समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार, डिजीटल इंडिया, उद्योगीकरण यावर चर्चा करायचो. मात्र, आज यातील कुठल्याच गोष्टीवर चर्चा होत नाही. आता गांजा नव्हे तर हर्बल तंबाखूवर चर्चा होते. दंगली, खंडणी, वसूली यावर चर्चा होते. या सरकारच्या काळातील अनाचार दुराचार इतका आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार म्हणून इतिहासात नोंद होईल. पुढे ते म्हणाले की, ज्याप्रकारे वसूली सुरु आहे की माजी गृहमंत्री तुरुंगात असताना प्रत्येक विभागात एक ‘वाझे’ आहे. सरकार सामान्यांसाठी नसून कायद्याचं राज्य नसून ‘काय ते द्या’चं राज्य सध्या आहे.
ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक
नुकत्याच काही धाडी पडल्या होत्या. आयटी विभागाच्या या धाडीमध्ये कुठे हजार कोटीची दलाली, कुठे पाचशे कुठे चारशे कोटीची दलाली. हजारो कोटी रुपयांची अक्षरश: वाटमारी आणि लूट चालली असून सामान्य शेतकऱ्याकेड कुणी पहायला तयार नाहीये. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कपडे उतरवणारा प्रस्ताव मांडला आहे. यांचे कितीही कपडे काडले तरी यांना काही फार फरक पडणार नाहीये. आता या सरकारविरुद्ध आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. गेले दोन वर्षे कोरोनाचं कारण सांगून रस्त्यावर उतरणाऱ्यावर गुन्हे दाखल करायचे. मात्र आता तसं होणार नाही.
Read Also :
- अमरावती दंगल घडवण्यामागे मंत्री नवाब मलिकांचा हात
- सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीच्या नेत्याने नाना पटोलेंना ठणकावलं
- काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जुंपली; भाई जगतापांची थेट सोनिया गांधीकडे तक्रार
- ‘प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध व्हावी’; बाळासाहेब थोरात करणार भाजपशी चर्चा
- “बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”