मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत इथून हालणार नाही. असा पावित्रा सदाभाऊ व पडळकरांनी घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात अस्तित्वात असलेले सरकार हे काळ्या पायाचे आहे. हे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्या लायकीचे आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.
“अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा
एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने महाविकास आघाडी सरकारविरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. काळ्या पायाचे हे आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब लोकांवर अनेक संकटे आली. तेव्हा त्यांच्या संकटाच्या काळात या सरकारने काहीच मदत केली नाही. सरकारने जर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या नाहीत आणि त्यांच्याशी चर्चा केली नाही, तर हेच एसटी कर्मचारी तुमचे दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा पडळकरांनी सरकारला दिला आहे.
आंदोलनाच्या सातव्या दिवशी आझाद मैदानावर #एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.@BJP4Maharashtra @Sadabhau_khot @maheshklandge pic.twitter.com/m8mD6OYv3u
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 16, 2021
राष्ट्रवादीला मोठा झटका, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत ‘हा’ नेता भाजपाचे कमळ घेणार हाती
दरम्यान, यावेळी गोपीचंद पडळकर यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. महामंडळाचे सचिव असलेले आदित्य ठाकरे हे परदेशात जातातच कसे? गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि हे परिवहन सचिव परदेशात जातात. त्यांची चौकशी झाली पाहिजे. ते मंत्रालयात आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासणार आहे, असे पडळकर यांनी सांगितले.
Red Also :
- नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल
- हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल
- अमरावती दंगल घडवण्यामागे मंत्री नवाब मलिकांचा हात
- सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीच्या नेत्याने नाना पटोलेंना ठणकावलं
- काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जुंपली; भाई जगतापांची थेट सोनिया गांधीकडे तक्रार