मुंबई : २०१५ साली वांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंत याच गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या भागात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. भाजपच्या स्थानिक नेत्या तृप्ती सावंत यांनी गळ्यात शाल घालून नारायण राणे यांचे स्वागत केले.
अमर, अकबर, अँथनी हिट झाला तसं हे सरकारही हिट होणार! नाना पटोलेंचा पलटवार
बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते, असे तृप्ती सावंत यांनी म्हटले. बाळासाहेब हेच आमचं दैवत आहे. आपला जुना शिवसैनिक मोठा होतोय, याचं स्वागत व्हायला हवं. आमचं आणि बाळासाहेबांचं नातं अतूट आहे, ते कधीच संपणार नाही. आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो तरी बाळासाहेबांपासून कधीही दुरावणार नाही, असे तृप्ती सावंत यांनी सांगितले. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
उदयनराजेंचा गंभीर इशारा, “मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा! नाहीतर…
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
Read Also :
- आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड; पाच जण ताब्यात