पुणे : पुण्यातील औँध येथील मयुर मुंडे या भक्ताने मोदींचे मंदीर बांधून दैवतीकरण केले होते. अशा प्रकारे मोदींचे मंदिर उभारण्यात आल्याने चहुबाजूंनी टीका होऊ लागल्याने हे मंदिर हटवण्यात आले आहे. मोदींचे मंदिर उभारल्यानंतर मयुर मुंडे चर्चेत आले होते. याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली. त्यामुळे, रातोरात मंदीरातील मोदींचा पुतळा हटवण्यात आला. त्याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाच “देव चोरीला गेला, आता आम्ही कोणाकडे साकडे घालायचे?”, अशा मागणीचे आंदोलन कऱण्यात आले.
औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. या मंदिर उभारणीचं वृत्त देशात चर्चिलं गेलं. यावर बरीच टीकादेखील झाली. त्यानंतर भाजप नेतृत्त्वानं याची दखल घेतली. आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं. त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे.
अजित पवारांचे दोन स्वीय सहाय्यक, खास पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बसणार
दरम्यान, रात्रीपासून मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवच चोरीला गेल्याने आम्ही कुणाला साकडे घालायचे? आता आपल्या देशापुढील समस्या कोण दूर करणार ?, यापुढे पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे ? आमच्या नवसाला कोण पावणार ? आमचे पंधरा लाख रुपये आता तरी मिळणार का?, असा सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. तर मूर्ती चोरीप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाणार आहे. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? म्हणत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले.
Read Also :
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड; पाच जण ताब्यात
- डॉ. स्वप्नील शिंदेंची आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, शासनाचे चौकशीचे आदेश
- उदयनराजेंचा गंभीर इशारा, “मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा! नाहीतर…