मुंबई : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मेट्रोचं काम थांबवण्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरु असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सर्व बाबी तपासून राज्य सरकार केंद्राला उत्तर देईल, अशी माहितीही मलिकांनी दिली आहे.
मुंबई मेट्रोसाठी कारशेड उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरची जागा उपलब्ध करून दिल्यावर आता त्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे, याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरे ची जागा कारशेडसाठी दिली होती, पण त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध करत कारशेडचं काम बंद पाडले होते.
आम्ही मेट्रो कारशेडसाठी जागा देण्यासाठीच्या संदर्भात अनेकदा मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना सूचना केल्या होत्या. पण आमच्या सूचनांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राला मुंबईकर आता त्रासलेत, अशी जळजळीत टीका आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर केली आहे.
आता त्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे, अडकवणे, भटकवणे आणि लटकवणे हीच आघाडी तिघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याची टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. कांजुरमार्गाची जागा ताब्यात घेताना मिठागर आयुक्तांची परवानगी घ्या, असं आम्ही म्हटलं होत पण त्यांनी ऐकलं नाही. या आघाडी तिघाडी सरकारची कार्यपद्धती हि निव्वळ लटकावण्याची आहे, असं हि शेलारांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारला कोणी काही सांगतय का? मुंबई उपनगरांची हि कनेक्टिव्हिटी आहे, आणी आरे हे जंगल आहे, राज्याच्या जबाबदार मुख्यमंत्र्यांनी आपले शपथपत्र दाखल केले आहे, पण आता काय निर्णय घ्यायचा तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका महापौर पेडणेकर यांनी घेतली आहे.
Read Also :
अडकवणे, भटकवणे आणि लटकवणे हीच आघाडी तिघाडी सरकारची कार्यपद्धती, आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल
अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राला मुंबईकर आता त्रासलेत,आशिष शेलारांचा ठाकरेंना जोरदार टोला
मेट्रो कारशेडबाबत पंतप्रधान मुंबईच्या हिताचा निर्णय घेतील : महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई मेट्रोबाबत केंद्राची नेमकी भूमिका काय आहे? मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा सवाल
मेट्रो कारशेडवरुन आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार रंगणार वाद