परभणी : राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी परभणी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल आवाज उठवला आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीयमंत्री रस्ते आणि वाहतूक नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली.
परभणी जिल्याचा विकास जर खऱ्या अर्थाने होणे आवश्यक असेल तर रस्ते आणि रेल्वे यांचे जाळे योग्य असणे महत्त्वाचे आहे. यामुळे मोठमोठे उद्योग जिल्यात येऊ शकतील आणि तरच जिल्याचा विकास होईल. परंतु जर आजमितीला जिल्यातील रस्तेबांधणीची गती पहिली असता पाच पाच वर्षे झाले तरी ती अपूर्ण आहेत. यावर जिल्यातील लोक प्रतिनिधी तसेच जनता सुद्धा गप्प आहे. परभणीत रस्ते जर पाहिले तर संपूर्ण दुरवस्था झाली आहे. कुठे खड्डे तर कुठे तडे अशी स्थिती आहे आणि असंख्य अपघात घडत असल्याचे फोजिया खान म्हणाल्या.
फौजिया खान यांनी माहिती दिली की, परभणीतील रस्त्यांची दुरवस्था व स्थिती नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली. गडकरींनी या विषयावर वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज साठी आवाज उठवला त्याचप्रकारे परभणीत चांगले रस्ते व्हावेत यासाठी पूर्ण संघर्ष करण्याचा निर्धार असल्याचे त्या म्हणाल्या. सोबतच, आपण आत्तापर्यंत शांत आहात. परंतु जिल्याचा विकास हवा असेल तर शांत बसून चालणार नाही…. याविषयावर आपण मला साथ द्या….जनतेने जर संघर्षाचा आणि विकासाचा विडा उचलला तर ते हे कार्य पूर्णत्वाला नेतीलच आणि परभणीतील रस्ते, रेल्वे मार्ग उच्च दर्जाचे होतील यात दुमत नाही, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
अधिकारी आणि कंत्राटदार यात आम्हाला साथ देत नसेल आणि बेईमानी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना विधायक मार्गाने वठणीवर आणले जाईल, असा इशारा देखील फौजिया खान यांनी दिला.
Read Also :