मुंबई : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस आणि घटक पक्षांमधल्या कुरबुरी वाढल्या असून, राज्यातले सरकार लवकरच गडगडणार असल्याच्या अफवांना राजकीय वर्तुळात पेव फुटले आहे. विरोधक देखील सातत्याने यासंबंधातले वक्तव्य करत असून, दुसरीकडे सरकारमधले मंत्री मात्र, आघाडी सरकार ५ वर्ष टीकेल अशा वल्गना करत आहेत.
यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सरकारविरोधात खळबळजनक वक्तव्य केले असून, देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले होते, “झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं, इतका विश्वासघात झाला. केसाने गळाने कापतात म्हणतात ते हे. तुम्ही सरकार कधी पडणार विचारत आहात, मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असतील तेव्हा हे सरकार पडेल आणि कुणाला कळणारच नाही आघाडी सरकार कधी गेलं,” असा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी ते बोलताना केला.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला असून, “चंद्रकांत दादा रात्री स्वप्न बघतात आणि सकाळी बोलतात. त्यांना अशी स्वप्न पाहण्यात आनंद मिळत असेल, तर त्यांनी तो उपभोगावा, मात्र आघाडी सरकार एकजुटीने काम करत आहे आणि हे सरकार आपली ५ वर्षे पूर्ण करेलच, शिवाय मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याप्रमाणे २५ वर्ष टिकेल, त्यामुळे तुम्ही २५ वर्ष अशी स्वप्न पाहत रहा,” असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
तसेच, राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले पाहिजे अशी काही लोकांची मनापासून इच्छा आहे. मात्र ते त्यांना शक्य होत नाहीये. चंद्रकांत पाटील जनता झोपेत असताना सरकार बदलेल असं बोलत आहेत, मात्र आघाडी सरकार जनता झोपेत असताना नाही, तर लोकांसमोर निर्णय घेते,” असा जोरदार टोमणा त्यांनी चंद्रकांत दादांना हाणला आहे.
Read Also :
- ‘भाजपचा आरक्षणाचा कळवळा केवळ दिखाऊ आणि भूमिका दुतोंडी’
- लॉकडाऊन कायम, मात्र निर्बंध शिथील होणार; कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
- “महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल,”
- पवारांची भेट घेवून संभाजीराजेंना काहीही साध्य होणार नाही – विनायक मेटे
- ‘महाविकास आघाडीचा जो अंतिम निर्णय तो आम्हाला मान्य’ – नितीन राऊत