जुन्नर : सहकार महर्षी माजी आमदार स्व. शिवाजीराव महादेव उर्फे दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी, शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला.
‘करेक्ट कार्यक्रमा’च्या इशाऱ्यांनंतर, शेट्टींच्या आमदारकी बाबत पवारांनी केला मोठा खुलासा
”शेती क्षेत्रापुढे अनेक प्रश्न आहेत. शेतीमालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य आणि चांगला भाव देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली, तरच शेतकरी देशाची गरज भागवू शकेल. मात्र, दुर्दैवाने आज केंद्राकडून जेवढे लक्ष द्यायला हवे होते, तेवढे यात दिले जात नाही. परिणामी शेतीमालाच्या किंमती घसरत आहेत,” असं म्हणत त्यांनी, ”माझ्याकडे कृषी खाते असताना, शेतकऱ्यांवर आम्ही पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही,” असा म्हणत त्यांनी नाव न घेता पंतप्रधानांवर टीका केली.
पवारांनी खंजीर खुपसल्याचा एक दाखला द्या, मी राजकारण सोडतो!
दुसरीकडे, गेले काही दिवस राजू शेट्टींच्या आमदारकीवरून राजकारण तापले होते. त्यावर राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला, “करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन,” असा इशारा दिल्यांनतर शरद पवारांनी, “त्यांचे सहकार आणि शेतीच्या क्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊन, यादीत त्यांचं नाव आहे. आता राज्यपाल अंतिम निर्णय घेतील. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
“आघाडीसोबत गेले आणि ‘काशी’ झाली, आता परत काढा आत्मक्लेश यात्रा”, खोतांचा शेट्टींना टोला
दरम्यान, आज शिरूरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांवरून आव्हान दिले. “आम्ही एकत्र काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो!” अशी ललकारी त्यांनी दिली. तसेच, “ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो,” असा टोलाही त्यांनी पाटलांना लगावला आहे.
Read Also :
- “आघाडीसोबत गेले आणि ‘काशी’ झाली, आता परत काढा आत्मक्लेश यात्रा”, खोतांचा शेट्टींना टोला
- ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- “निवडणुकांशिवाय महापालिका ताब्यात ठेवायचा सरकारचा कट”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘…तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी’, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
- “पक्षात महिलांना डावललं जातं”, या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…