पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत आज शिरुर-हवेली इथे आले होते. यावेळी, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे. “आम्ही एकत्र काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो!” अशी ललकारी त्यांनी दिली आहे. तसेच, “ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो,” असा टोलाही त्यांनी पाटलांना लगावला आहे.
‘…तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी’, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
“आम्ही शिवाजी राजांचे मावळे आहोत. कधी पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो, असं मी बोलले. याचा त्यांना त्रास झाला. थेट गुन्हा दाखल करा म्हणाले. आता समोरून वार केल्यावर काय निघणार? कोथळाच ना! मीही तेच म्हणालो,” असा टोला लगावत, “चंद्रकांत दादांना राज्यात शिवसेनेचं सरकार आहे, हे सहन होत नाहीये.” असं ते म्हणाले. तसेच, “आघाडीच्या नेत्यांना सांगणं आहे, विरोधकांसारखे वागू नका! नाहीतर शिवसेनेच्या भाषेत सांगू! असा इशारा त्यांनी दिला.
“खंजीर खुपसणाऱ्या सेनेला धडा शिकवण्यासाठी हेच एक उत्तर!”, पाटलांनी सांगितला फॉर्म्युला
तसेच, “आपलं सरकार आलं असलं तरी तेच प्रश्न आहेत. खोटे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे, आता बघयाची वेळ आली आहे,” असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला. राज्यात सत्ता परिवर्तन झालंय. पण स्थानिक पातळीवरील नेत्यांनी संयम ठेवावा. आपल्याला एकत्र संसार करायचा आहे. तुम्हीही मुख्यमंत्री आमचा आहे असं सांगा. आधीच्या सरकारमध्ये हाच त्रास होता. त्यामुळे, आपलं सरकार असूनही गुन्हे दाखल होत असतील तर गंभीर आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“…आता तसं कुणी म्हटलं कि दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,” चंद्रकांत पाटलांचं युतीबद्दल मोठं भाष्य
दरम्यान, “राज्यपाल हे पद आणि ती व्यक्ती आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहे आणि असेल. मी त्यांच्यावर टीका केली नाही. पण तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या हातात असेल, तर मला आता अटक करा’, असं खुलं आव्हान देखील संजय राऊत चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. तसेच, ‘चंद्रकांत पाटलांनी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य नीट आहे का पाहिलं पाहिजे. कदाचित ते वैफल्यग्रस्त आहेत’, अशी सडकून टीकाही त्यांनी केली. त्यामुळे, हे द्वंद्व किती दिवस चालते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
Read Also :
- ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- “निवडणुकांशिवाय महापालिका ताब्यात ठेवायचा सरकारचा कट”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या इशाऱ्यांनंतर, शेट्टींच्या आमदारकी बाबत पवारांनी केला मोठा खुलासा
- “आम्ही खंजीर खुपसत नाही, थेट समोरून कोथळा काढतो” राऊतांचा घणाघाती हल्ला
- “सेनेसोबत युतीचा विचारही नाही! पण भविष्यात काहीही होऊ शकते; पाटलांचे सूचक विधान