अकोला : अमरावती मध्ये बोलताना शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लबोल केल्यांनतर आज पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना देखील जाहीर आव्हान दिलं आहे. “पोपटाचा प्राण सत्तेत आहे! “पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महापालिका जिंका आणि राज्यात एकहाती सत्ता आणा, हेच उत्तर आहे.” असं ते म्हणाले.
“राऊत, बेळगाव जिंकू! हा दावा करत असतील तर…”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
तसेच, २०१४ विधानसभेत सेनेने मोठा दगा केला आणि पाठीत खंजिर खुपसला. त्यामुळे, सध्या तरी आम्ही स्वबळावरच आगामी निवडणुका लढवणार आहोत. आमचा पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत जाण्याचा विचारही नाही. पण माणूस आशेवर जगत असल्याने भविष्यात काहीही होऊ शकते,” असे सूचक आणि परस्पर विरोधी विधाने एकाच वेळेस पाटील यांनी केले आहे. “कार्यकर्त्यांना मला संभ्रमात ठेवायचे नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे.
“अनिल परबांची विकेट काढल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणारा नाही!” सोमैय्यांचा इशारा
काल अमरावतीत बोलताना त्यांनी, “शिवसेना फक्त मुंबईत होती. त्यांना प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा-विदर्भात आणलं आणि आता ते ५६ वर आहेत. आधी युती करायची, मोदींच्या नावानं मतं मागायची आणि जागा आल्या की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं. मी पुण्यातून येत होतो. त्यादिवशी ४ वा. फडणवीस-ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार होती. पण उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही तुमची पीसी करा, तिथेच गडबड झाली. हा विश्वासघात नाही का? असा सवाल त्यांनी केला होता.