मुंबई : राज्यात इतकं मोठ बंड आम्ही केलं. या बंडामध्ये थोडा जरी आम्हाला दगाफटका झाला असता तर शहिद होण्याची वेळ आली असती. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील दौऱ्याच्या वेळी केलं. त्यावर आता राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
“पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
विद्या चव्हाण यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शहीद झाला असता तर अमर तरी झाला असता महाराष्ट्रासाठी. बाळासाहेबांसाठी. अगदीच नाही तर आनंद दिघेंसाठी. अमरतेचं उदात्तीकरण तरी करता आलं असतं. परंतु आता तर बळी कधी केव्हा. कसं जालं हेही कळणार नाही. खास शैली आहे, भाजपची. भाजप है तो मुमकीन है. मनसुख चे काय झाले?
“तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
आम्ही बंड केलं. ती लढाई काही छोटी नव्हती. लढाई खूप मोठी होती. तशी कठीणही होती. एककीडे सरकार सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच ठेवला जात होता. तर दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. आम्हाला दगाफटका होईल असं वाटत होतं. दगा फटक्यात धोका होता. अशावेळी थोडं जरी इकडं तिकडं झालं असतं तर शहीदच झालो असतो असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.
“तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी माझं मुळ गाव अजूनही विसरलो नाही. त्यामुळे माझ्या मुळ गावी आलो आहे. जनतेचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून मला गहिवरून आलं आहे. माझ्या गावी आलोय. साताऱ्याचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हे टुरिस्ट स्पॉट व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असं देखील ते म्हणाले.
Read also
- मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा
- “75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
- “इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”
- “पत्नी, मुलगा नाही तर ड्रायव्हर किंवा चमच्यासाठीही आता नेते उमेदवारी मागतात”; गडकरींनी टोचले राजकारण्यांचे कान
- “उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”