मुंबई : शिवसेनेविरोधात यशस्वी बंड केल्यानंतर आता बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतत आहेत. यापुर्वी बंडखोर आमदार विधानसभेत माझ्या डोळ्याला डोळे कसा लावणार, तसेच कोणत्या तोंडाने ते आपल्या मतदार संघात परतणार ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर टिका केली आहे.
“काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता”
निलेश राणे म्हणाले की, बाळासाहेबांचे शिवसेना आमदार जल्लोषात मतदारसंघात गेले आहे. मागील काही दिवसात आदित्य ठाकरें विचारत होते की बंडखोर आमदार मतदार संघात परत कसे जाणार? काय उखाडलं त्याने? असा सवाल निलेश राणे यांनी केला. तसेच त्या आमदारांची प्रतिक्रिया ऐकल्यावर खरी शिवसेनेची वाट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीच लावली यात कुठलीच शंका उरली नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला”; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदारांचा जल्लोषात स्वागत केलं जात आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना तर कार्यकर्त्यांनी कांद्यावर घेऊन त्यांची भव्य अशी मिरवणुक काढली. त्यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह खुप मोठा होता. तसेच इतर बंडखोर आमदार देखील आपल्या मतदार संघात परतले असून त्यांचा कार्यकर्त्यांकडून सत्कार केला जात आहे.
“कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंद”
दरम्यान, शिवसेनेविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत आता शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आहेत. मात्र अशातच आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काल सांगोल्यात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमच्यासोबत 18 खासदारांपैकी 12 खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. अशातच आता शिवसेनेच्या एका खासदारांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रपतीच्या निव़डणुकीत भाजपप्रणित पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
Read also
- “अफवांवर विश्वास ठेऊ नका”; शरद पवारांसोबत व्हायरल झालेल्या फोटोचं शिंदेंकडून खंडण
- “ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो”
- “भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या
- “देवेंद्रजी रात्री वेश बदलून एकनाथ शिंदें भेटायला जायचे”; अमृता फडणवीसांचं गौप्यस्फोट
- “विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा”; मनसेचा सवाल