नागपुर : शेतकर्यांचे, विकासाचे अनेक प्रकल्प थांबले होते. महाविकास आघाडीतील अंतर्विरोध दररोज दिसत होता. शिवसेनेसमोरचे प्रश्न तर मोठे होते. त्यांच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतल्याने अस्वस्थता अधिक होती. यातून शिवसेनेत एक उठाव झाला. ते बंड नाही. त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली. आम्ही म्हटले असते, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. पण, पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते नागपुर प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात बोलत होते.
“वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपली”
विधानभवनात आम्ही काल प्रचंड बहुमताने आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकला. राज्यात महाविकास आघाडी तयार झाली, तेव्हाच आम्ही सांगितले होते की, अशी अनैसर्गिक आघाडी फार काळ चालत नाही. आमचे सरकार गेल्याचे मला दु:ख नव्हते, तर महाराष्ट्र विकासात माघारतोय, याचे दु:ख अधिक होते. उलट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव सुद्धा मीच दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्त्वाने आग्रह धरल्याने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. असंही ते म्हणाले.
हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवेंच्या जिवितास धोका; त्यांची काळजी घेण्याचं राऊतांचं पोलिसांना आवाहन
विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागास भागावर अन्यायाची मालिका महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली. त्यामुळे विकासाला, राज्याला प्रगतीला खीळ लावणारे सरकार जाणे, याला प्राधान्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अतिशय सुयोग्य निर्णय घेतला. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदावर बसविले, त्या पक्षाचा आदेश माझ्यासाठी शीर्षस्थानी आहे. असंही ते म्हणाले.
“लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका
काँग्रेसने मोदीजींना चायवाला म्हणून हिणवले, त्याच आमच्या पंतप्रधानांनी आज काँग्रेसला पाणी पाजले आहे. त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले नाही, तर सामान्य माणूसच राज्य करेल. आमची चिंता करू नका. आम्ही एकमेकांना देणारे आहोत, एकमेकांकडून घेणारे नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- तर मातोश्रीची पुजा करून सर्वच आमदार निवडून आले असते; अपक्ष आमदारांचा टोला
- बापरे..! दोन मयत शिवसैनिकाची पदाधिकारी म्हणून निवड
- राष्ट्रवादी आता फुटीच्या उंबरठ्यावर! राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम
- बंडखोर आमदाराची आदित्य़ ठाकरेंवर खिल्ली; म्हणाले, “त्यांच्या चष्मातून डोळे दिसतील तर..”;
- शिंदे सरकार मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा 12 जुलैला शपथविधी! कुणाला मिळणार संधी?