मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत आता दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे मेळावे, बैठका जोरदार सुरू आहेत. अशातच मीरा भाईंदर येथे शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यामध्ये निधन झालेल्या झालेल्या दोन शिवसैनिकांची पदाधिकारी म्हणून निवड झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.
“लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका
मीरा भाईंदर येथील प्रभाग क्रमांक 10 मधील पदाधिकाऱ्यांच्या यादीत उपविभाग प्रमुख म्हणून प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली. मात्र त्यांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे. तर प्रभाग 3 मध्ये उपविभाग प्रमुख नेमलेले भास्कर रोडे यांचेही गेल्या वर्षी कोरोना काळात निधन झाले आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा सर्व प्रकार लक्षात येताच शिवसेनेने त्यांच्या जागी दुसऱ्यांची निवड केली.
“तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं
तर मीरा भाईं येथे काही महिन्यापुर्वी पश्चिम शाखेत सेनेच्या महिला व पुरूष पदाधिकाऱ्यात मोठा राडा झाला होता. त्यामुळे तेथील शहरातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यकारीणीची निवड करण्यात आली होती. मात्र प्रताप सरनाईक शिंदे गटात सामिल झाल्यानंतर ही कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली होती.
“संविधान सांगतो तोच सर्वश्रेष्ठ कायदा, नो हिटलरशाही, नो गैरयंत्रणा”; रूपाली पाटील
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना भवनात त्यांनी शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, नगरसेवक, माजी महापौर, जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी महिला आघाडीची देखील मागे बैठक घेतली होती.
Read also
- राष्ट्रवादी आता फुटीच्या उंबरठ्यावर! राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम
- बंडखोर आमदाराची आदित्य़ ठाकरेंवर खिल्ली; म्हणाले, “त्यांच्या चष्मातून डोळे दिसतील तर..”;
- शिंदे सरकार मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा 12 जुलैला शपथविधी! कुणाला मिळणार संधी?
- “वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपली”
- हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवेंच्या जिवितास धोका; त्यांची काळजी घेण्याचं राऊतांचं पोलिसांना आवाहन