पुणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शिवसेना असं सध्या चित्र सेनेत निर्माण झालं आहे. मात्र शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच राहणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा सेनेवर कब्जा होणार नसल्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
त्यामुळेच आदित्य ठाकरेंना अपात्रतेची नोटीस पाठवली नाही; सेनेच्या 14 आमदारांना नोटीस
भारतात किंवा महाराष्ट्रात संविधान सांगतो तोच सर्वश्रेष्ठ कायदा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सर्व धर्म, जात एक समान, नो हिटलरशाही, नो गैरयंत्रणा वापर, असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेमकी कुणाची असा सवाल सर्वसामान्य लोकांना पडला होता. मात्र आता एकनाथ शिंदे गटाला विधिमंडळ गट म्हणून विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.
“आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडी शाहीला टरकलेले आहेत” हरी नरके
छगन भुजबळ यांनी ११ आमदारांनी ज्यावेळी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांच्या गटाला शिवसेना बी म्हणून विधिमंडळात मान्यता दिली होती. तसेच छगन भुजबळ यांनी पुढे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच नारायण राणे, राज ठाकरे, आणि गणेश नाईक यांनी देखील या अगोदर शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली.
मुख्यमंत्र्यांनी आज केल्या तीन महत्वाच्या घोषणा; तालिका अध्यक्षांची देखील जाहीर केलीत नावे
दरम्यान, वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपुष्टात येऊन आता भाजपा-शिवसेना युती सरकार आल्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा करत सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारा स्तुत्य निर्णय घेतला आहे. असं पराग शाह यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी भाजपने अनेक राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांना तुरूंगात जावं लागलं आहे. तर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर सध्या इ़डीचा ससेमिरा पाठीमागे आहे.
Read also
- “वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपली”
- हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवेंच्या जिवितास धोका; त्यांची काळजी घेण्याचं राऊतांचं पोलिसांना आवाहन
- “लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “तर आम्ही तुमच्या पाया पण पडू”; अजित दादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया