मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जहरी टिका केली होती. तसेच आदित्य ठाकरे नेहमी सांगत असे की, सभागृहात बंडखोर आमदार आमच्या डोळ्यात कसे डोळे मिळवतील. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी यावर प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे यांच्याबाबत मस्करी केली आहे. तसेच त्याठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते देखील हसू लागले.
“संविधान सांगतो तोच सर्वश्रेष्ठ कायदा, नो हिटलरशाही, नो गैरयंत्रणा”; रूपाली पाटील
ज्यावेळी सभागृहात बंडखोर आमदार येतील. त्यावेळी ते आमच्या डोळ्यात कसे डोळे मिळवार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे. असा प्रश्न संजय गायकवाड यांना विचारल्यावर त्यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उठवली. ते म्हणाले की त्यांच्या चष्मातून डोळे दिसतील तर ते आमच्या डोळ्यात डोळे मिळवणार ना! तसेच त्यांनी कधीही आमदारांना नमस्कारही केला नाही. असंही संजय गायकवाड म्हणाले.
“तर आम्ही तुमच्या पाया पण पडू”; अजित दादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया
संजय गायकवाड यांच्या या कृत्यामुळे शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ज्या आमदारांना आम्ही निवडून दिले. ते आमदार आता आमच्यासाठी गद्दार झालेत. असाही सुर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटताना दिसत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. उर्वरित शिंदे सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी 12 ते 13 जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे बंडखोर आमदार आणि भाजप आमदारांमधून कुणाला लॉटरी लागणार त्याची उत्सुकता सगळ्यानांच लागून राहिली आहे.
त्यामुळेच आदित्य ठाकरेंना अपात्रतेची नोटीस पाठवली नाही; सेनेच्या 14 आमदारांना नोटीस
मुख्यमंत्री पद हा शिवसेनेला गेल्यानंतर शिंदे सरकारमध्ये भाजपकडे महत्वाची खाती म्हणजे गृह, आर्थिक खाती जाण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडे सार्वजनिक बांधकाम, नगरविकास खातं जाणार आहे. कारण उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदेकडेच ही दोन्ही खाती होती. त्यामुळे शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना ही खाती मिळणार ते आता पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- शिंदे सरकार मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा 12 जुलैला शपथविधी! कुणाला मिळणार संधी?
- “वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपली”
- हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवेंच्या जिवितास धोका; त्यांची काळजी घेण्याचं राऊतांचं पोलिसांना आवाहन
- “लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं