मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्व बंडखोर आमदार आता आपल्या मतदार संघात परतले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक बंडखोर आमदारांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवेंच्या जिवितास धोका; त्यांची काळजी घेण्याचं राऊतांचं पोलिसांना आवाहन
मातोश्रीच्या आशीर्वादाने आमदार झालो असतो तरं सर्वच आमदार निवडून आले असते. सामना कोण लिहितो साऱ्या जगाला माहित आहे. त्यामुळे त्यात काय लिहिलंय. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही. शिवाय एकनाथ शिंदे यांना मुख्य प्रक्रियेतून डावलेले होते, याची सुद्धा खंत नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली.
“लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका
ज्यांना आम्हाला निवडून आणल्याचे क्रेडिट घ्यायचे असेल तर त्यांनी खुशाल घ्यावे, जर मातोश्रीची पुजा करून सर्वच आमदार निवडून आले असते. तर त्यांचं काही अस्तित्व आहे की नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या बंडात नरेंद्र भोंडेंकर देखील होते. सुरूवातीला सुरत आणि त्यानंतर ते गुवाहाटीला देखील गेले होते.
“तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना भवनात त्यांनी शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, नगरसेवक, माजी महापौर, जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी महिला आघाडीची देखील मागे बैठक घेतली होती.
Read also
- बापरे..! दोन मयत शिवसैनिकाची पदाधिकारी म्हणून निवड
- राष्ट्रवादी आता फुटीच्या उंबरठ्यावर! राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम
- बंडखोर आमदाराची आदित्य़ ठाकरेंवर खिल्ली; म्हणाले, “त्यांच्या चष्मातून डोळे दिसतील तर..”;
- शिंदे सरकार मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा 12 जुलैला शपथविधी! कुणाला मिळणार संधी?
- “वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपली”