मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी स्वांतत्र्य आंदोलनाचे तेजस्वी पर्व आणि अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यांची वाटचाल या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी स्वांतत्र्यांच्या संग्रामात क्रांतीविरांचं योगदान यावर भाषण केलं. यामध्ये जर भारतात स्वांतत्र्यवीर सावरकर मोठे नेते नसतील तर या देशात मग कुणीही मोठे नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
“काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप असणारा नगरसेवक राष्ट्रवादीत”
बाबासाहेब पुरंदरे नसते तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला नसता. डॉ. हेडगेवार हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता. मात्र, योग्य माहिती नसल्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होतात. आजच्या पिढीला आणीबाणी किंवा सत्याग्रह याबद्दल काहीही माहिती नाही. आपला जुना इतिहास नव्या पिढीकडे नेण्याचे काम आपण इंग्रजांकडून शिकावे. एवढ्याशा इंग्लंडने संपूर्ण जगावर कसे राज्य केले? संशोधनाचा विषय आहे. असंही ते म्हणाले.
“आता गावोगावी गुलाल उधळणार, 608 ग्रामपंचायतींमध्ये जनता सरपंच निवडणार” निवडणुका जाहीर
पुढे बोलताना म्हणाले की, आपल्याला आपल्याच गोष्टींचा अभिमान नाही. भारतीय संस्कृतीचे जगात जितके आकर्षण आहे, तितके आपल्या देशात नाही स्वातंत्र्यवीर सावरकर जर मोठे ठरत नसतील तर या देशात मग कुणीही मोठे ठरू शकणार नाही, इतका मोठा त्याग त्यांनी मातृभूमीसाठी केला आहे. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना यापेक्षाही…;”
स्वातंत्र्याच्या इतर इतिहासाबरोबरच आर्थिक इतिहासाचेही लेखन केले जावे. देशाच्या निर्माणात आर्थिक दृष्टीकोनही महत्वाचा आहे. साम्यवाद, समाजवाद, भांडवलवाद, आता संपुष्टात आले आहे. अमेरिकन मुक्त अर्थव्यवस्था ठरली आहे. अत्याोदयच्या तत्त्वाचा आधार घेऊन सामाजिक व आर्थिक परिवर्तन कऱण्याची आवश्यता आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- अन् चंद्रकांत खैरे पोहचले कामाख्या देवीच्या दर्शनाला; कोर्टात केस जिंकावी, परत शिवसेनेचे सरकार यावं,
- “रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”
- “आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
- “नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव
- “उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं वक्तव्य येणार नाही, भावनिकरित्या कुटुंबांशी जोडलोय”; धैर्यशीलराव माने