नागपूर : ‘भाजपचा कुठलाही नेता आणि विशेषतः आशिष शेलार कुठल्याही महिलेबाबत अभद्र आणि चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत, महापौरांबाबत तर कधीच नाही.” काल त्यांच्या प्रेसनोटचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
एक सोपा आणि साधा संकल्प पूर्ण करणार का? पंकजा मुंडेंचे भावनिक पत्र व्हायरल
तसंच आशिष शेलार शिवसेनेच्या विरुद्ध आक्रमकतेनं बोलतात त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला का? हा प्रश्न आहे. महापौर किंवा कुठल्याही महिलेबाबत आदर आहे. आशिष शेलार चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. असं म्हणत फडणवीसांनी शेलारांची पाठराखन केली. दरम्यान काँग्रेस नेते नागपुरात उमेदवार बदलला काय, किंवा तोच ठेवला काय.. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या फरकाने जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही बाबतीत राजकारणा पासून दूर राहीलं पाहिजे, विशेषतः सेनाप्रमुख CDS यांचा विषय आहे. तिथे असे लुज वक्तव्य करण्यापेक्षा देशाची सर्वोच्च प्राथमिकता हा अपघात का झाला ही आहे. तिन्ही सेना मिळून याची चौकशी करत आहेत. चौकशी होईपर्यंत याबाबत बोलणे अनुचित आहे. असं प्रत्युत्तर त्यांनी राऊतांच्या विधानावरती दिलं.
Read Also :
- संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा
- पुण्यातील भाजपचे महापौर अडचणीत; मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
- कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला – आशिष शेलार
- शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंनी भरला दम