नाशिक : कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती नाही, ज्याच्या मनात सल नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या धमण्यांमधून संस्कार वाहतो, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केले.
अनिल देशमुखांनंतर पुढचा नंतर शिवसेना नेत्याचा; ‘त्या’ ट्विटमुळे उडाली खळबळ
राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होईल असं कोणाला वाटलं नव्हतं, पण ते आता होतंय, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. सध्या राज्यात सुरू असलेल्या अनेक घडामोडींवरही पकंजा मुंडे यांनी आपल्या सूचक शब्दांमधून भाष्य केले. त्या म्हणाल्या, राजकारणात उदाहरण सेट करण्यासाठी चांगले लोक यावेत. अनिल देशमुख यांची अटक हा प्रक्रियेचा भाग आहे. ती सुरू आहे. मी जज नाही. त्याच्यावर जे बोलत आहेत, ते इतके बोलत आहेत की, मला बोलण्याची आवश्यकता नाही. मी पेन घेऊन बसलेले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. मंत्री मंत्री झाल्यावर मी अनेक योजना नाशिकमध्ये राबवल्या. आज मी राष्ट्रीय सचिव म्हणून इथे आले आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक वाढवली पाहिजे. अशा बस उपलब्ध झाल्या, तर वाहतूक कोडींचा प्रश्न कमी होईल, असं म्हणत त्यांनी शहर बसचे कौतुक केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, आमचा उमेदवार आघाडीवर असल्याचं जयकुमार भाऊंनी मला आता सांगितलं. मी मध्यप्रदेशची आहे ना, आता मी बाहेरची आहे. खरं सांगू, पण मला वाटलंच नाही मी बाहेर आहे. अस वाटलं मी माहेरीच आहे. कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती सापडणार नाही, की ज्याच्या मनात सल नाही. मात्र, हे सगळं बाजूला ठेवून काम करा, असं आवाहन पकंजा मुंडे यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केले. मात्र, त्यांच्या मनात नेमकी कशाची सल आहे, याची चर्चा यामुळे रंगली.
Read Also :
- फटाके जरूर फोडा पण, धूर काढू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला
- दादर-हवेलीमध्ये शिवसेनेची ऐतिहासिक विजयाकडे कूच; देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर आघाडीवर
- देवेंद्र फडणवीसजी, आता माफी मागा; ‘त्या’ विषयावरून नवाब मलिक कडाडले
- आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील – संजय राऊतांचा इशारा
- तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस