मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदेंना याआधी गडचिरोलीचे पालकमंत्री असताना जीवे ठार मारण्याची धमकीचा फोन आला होता. त्यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा आणखी तीव्रपणे सक्रिय झाल्या आहेत. यातच आता पुन्हा एकदा ये प्रकरण बाहेर आल्यानंतर गृहविभाग देखील सक्रिय झाला आहे.
“तुमच्या अंगणामध्ये उगवलेल्या दोन धतुऱ्यांकडे लक्ष द्या”; सेेनेचं राणेंना सणसणीत प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसह इतर बाबींवर गृहविगाची नजर असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. मात्र शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती खोटी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणाला अटक केली होती. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.
“उगवत नाही, फुलत नाही अन् वास येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीतच”; राणेंचा ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांंचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात महिनाअगोदर धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा फोन देखील आला होता.
Read also
- “नवाब मलिकांनी संजय राऊतांना तुरूंगात काय सांगितलं असेल..;” शिंदे गटाचा खोचक टोला
- “छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालोय, ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय”
- “एक तरफ दसरा, एक तरफ कचरा”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
- “अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल”
- “अजित दादांना काहीच काम राहिलं नाही, त्यांनी शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांचं भाषणं ऐकावीत”