मुंबई : खोके खोके काय करता? जनता कोरोनाला विसरून गेली. तुमचे खोके कधी विसरून जाईल तुम्हाला कळणार नाही. खोक्याच्या भरवशावर मत मिळत नाही. विकाऊ असतो तर आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले नसते. छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालो आहे. आम्ही जे केलंय. ते सांगून केलंय. ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय. असं म्हणत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबरराव पाटलांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“उगवत नाही, फुलत नाही अन् वास येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीतच”; राणेंचा ठाकरेंना टोला
मातोश्रीवर सेवा करत असलेल्या चरणसिंग थापा यांनी देखील एकनाथ शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. यातच उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु यावर अजूनही ठोस माहिती समोर आली नाही. यातच आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबरराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली आहे.
गुजरातमध्ये मोदीचं भाषण न ऐकताच लोकांनी काढला पळ..! “जुमलेबाजीला जनता वैतागलीय”, काॅंग्रेसने डिवचलं
दसरा मेळाव्यासाठी संजय राऊत आले तर काय होईल? या प्रश्नावर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, दसरा मेळाव्यात संजय राऊत आलेत तर त्यांना टीका करता येईल का? हे सर्वात महत्वाचं आहे. तुरूंगात नवाब मलिक यांनी संजय राऊतांना काय सांगितलं असेल माहिती नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालोय, ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय”
- “एक तरफ दसरा, एक तरफ कचरा”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
- “अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल”
- “अजित दादांना काहीच काम राहिलं नाही, त्यांनी शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांचं भाषणं ऐकावीत”
- “तुमच्या अंगणामध्ये उगवलेल्या दोन धतुऱ्यांकडे लक्ष द्या”; सेेनेचं राणेंना सणसणीत प्रत्युत्तर