मुंबई : निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असते. निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये तसचं पराभावाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपलं गेले पाहिजे असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीची बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवले. तसेच आता विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. त्यावर लक्ष्य केंद्रीत करून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करायची असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज मुंबईतील राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवविले जातील, असे अजित पवारांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय हे महायुतीच्या सरकारच्या काळात घेतले आहेत. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा ही आपल्या पक्षाचा मूळ गाभा असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही ही विचारधारा सोडणार नाही, अशीही अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा..विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप अन् मनसे आमनेसामने, कोण जिंकणार ?
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. येणारी विधानसभा निवडणूक आपणा सर्वांसाठी महत्त्वाची असून त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे प्रफुल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार देशभरात करायचा असल्याचा निर्धार प्रफुल पटेलांनी केला. त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं.
येत्या ४ जूनला एनडीएचं सरकार येईल. मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही सर्वांनी अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यावर महाराष्ट्राची जनता १०० टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात वैचारिक पातळी खालावलेली दिसली. मात्र, प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी कोणाविषयी टीका टिपण्णी करताना मर्यादा ओलांडली नाही, याचा सुनिल तटकरे यांनी आवर्जून उल्लेख केला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार आहोत याचा अभिमान असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा..अग्रवाल कुटुंबीय कायद्याच्या कचाट्यात चांगलेच अडकले, दुसरी तक्रार दाखल, प्रकरण काय ?
पुढे आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे त्या दृष्टीने आपल्याला आता संघटनात्मक बांधणी करायची आहे. एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र ही भूमिका घेऊन आजपासून सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन करत आपल्याला अपेक्षित असलेले यश निश्चितपणे मिळेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनापूर्वी जिल्हास्तरावर विभागीय मेळावे घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच १० जूनला पक्षाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागून त्यादृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर द्यावा आणि सर्वांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या,” पुणे अपघात प्रकरणी अजित पवार असं का म्हणाले ?
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार
हेही वाचा..भुजबळ म्हणताहेत, विधानसभेला आम्हाला ८० ते ९० जागा, मग भाजप अन् शिंदेंच्या वाट्याला किती ?
हेही वाचा..“०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल”